औरंगाबाद रेल्वे अपघात: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 8, 2020

औरंगाबाद रेल्वे अपघात: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत

https://ift.tt/2LaZtcx
नवी दिल्ली: औरंगाबाद येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केली आहे. या बरोबरच या अपघातातील जखमींवरील उपचाराची सर्व व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत. या बरोबरच एका विशेष विमानाने उच्च अधिकाऱ्यांचे एक पथक औरंगाबादला पाठवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले. हे पथक मृत पावलेल्या कामगारांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करेल, तसेच जखमींनाही मदत करेल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात असून जखमी मजुरांवरील उपचारात कोणतीही कमरता होणार नाही याची व्यवस्था करत असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादहून आपल्या घरी परतणाऱ्या मजुर बांधवाच्या आपघाती निधनाची बातमी आली. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे मोठे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो असी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तसेच जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.