मन की बात: 'करोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही, सावधगिरी बाळगा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 31, 2020

मन की बात: 'करोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही, सावधगिरी बाळगा'

https://ift.tt/3chP4XL
नवी दिल्ली: उद्या पासून, अर्थात १ जूनपासून देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा समाप्त होऊन ५ वा टप्पा सुरू न होता अनलॉक-१ सुरू होत आहे. हा नवा टप्पा ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाची काल वर्षपूर्ती झाली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. मोदी यांचा हा ६५ वा 'मन की बात' कार्यक्रम आहे. काय म्हणत आहेत पंतप्रधान मोदी हे पाहुया या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून... Live अपडेट्स... >> आम्हाला करोनाविरोधातील लढाई सावधगिरीने लढायची आहे. करोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. आम्ही बेजबाबदारीने वागून चालणार नाही- पंतप्रधान मोदी. >> तुमच्या जीवनात योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने अनोखा प्रयोग केला आहे. My Life, My Yoga नावाने आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉगवर स्पर्धा सुरू केली आहे. भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोक या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत- मोदी. >> करोना संकटाच्या काळात योग महत्त्वाचा आहे. कारण हा विषाणू रिस्पायरेटरी सिस्टमवर परिणाम करतो. योगात रिस्पायरेटरी सिस्टम मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारचे प्राणायम आहेत. त्यांचे परिणाम दीर्घकालीन असतात- मोदी. >> प्रत्येक ठिकाणी लोक योग आणि त्याबरोबरच आयुर्वेदाशी जोडले जात आहेत. ज्या लोकांनी कधीही योग केलेला नाही, असे लोकही ऑनलाइन योग क्लास सुरू करत आहेत- मोदी. >> करोनाच्या या संकटकाळात आम्ही स्थिती सुधारली आहे, ती बिघडू देता कामा नये- पंतप्रधान मोदी. >> करोनाच्या या संकटकाळात माझी जगातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे. या दिवसांमध्ये त्यांचा रस योग आणि आयुर्वेदामध्य आहे- पंतप्रधान मोदी. >> पाणी आहे जर जीवन आहे. पाणी आहे तर जबाबदारी सुद्धा आहे. आम्हाला पाणी वाचवण्याची आवश्यकता आहे. >> यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात केला अम्फान महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा उल्लेख. >> आयुष्मान भारत योजनेमुळे गरीब जनतेचे पैसे वाचले- मोदी. >> आयुष्मान भारत योजनेचे ८० टक्के लाभार्थी हे ग्रामीण भागातील- मोदी. >> देशातील १ कोटी पेक्षा अधिक लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला- मोदी. >> इतर देशांच्या तुलनेत भारतात करोना विषाणूता प्रसार कमी झाला- मोदी. >> अंधारात प्रकाशाकडे जाणे हा मानवी स्वभाव आहे- मोदी. >> ईशान्य भारतातील भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे- मोदी. >> ईशान्य भारताचा विकास ही आमची प्राथमिकता आहे- मोदी. >> जगाशी तुलना केल्यास भारतातील करोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी- मोदी. >> सेवा आणि त्याग हे आमचे आदर्श आहेत, हे देशाने दाखवून दिले आहे- मोदी. >> अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर देशातील जनतेला अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे- मोदी. >> सावधगिरीचे भान ठेवत देशातील विमानसेवा सुरू झाली आहे- मोदी. >> हळूहळू देशातील व्यवहार सुरू होत आहेत- पंतप्रधान मोदी. >> देशात उद्यापासून 'अनलॉक-१' सुरू होत असून, पंतप्रधान मोदी त्याबाबत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ६५ व्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी साधत आहेत संवाद.