
त्रिपुरा- सोशल मीडियावर यांच्याविरोधारत आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल बांग्लादेशी गायक उर्फ नोबलविरोधात एफआयआर दाखल केली आहे. गेल्यावर्षी बांग्लादेशमधील सा रे गा मा पा या रिअॅलिटी शोमध्ये नोबलने भाग घेतला होता. या स्पर्धेत तो तिसऱ्या स्थानी होता. मेनुल एहसान नोबलविरोधात सुमन पॉल नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नोबलवर मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह गीत रचण्याविरोधात आणि ते गीत सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल तक्रार नोंदवली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ५००, ५०४, ५०५ आणि १५३ अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार त्रिपुरा पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे सोपवण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सुमन पॉलने त्याच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, 'आज मी मेनुल एहसान नोबलविरोधात तक्रार नोंदवली. मी भारतीय उच्चायुक्तांना विनंती करतो की त्याचा व्हिसा रद्द करावा. त्याच्यासोबतचे सर्व करारही रद्द करावे. जेणेकरून तो पुन्हा भारतात येऊ शकत नाही.' मेनुलने फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच नाही तर याआधी रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही आक्षेपार्ह टिपणी केली होती.