औरंगाबादमध्ये आतापर्यंत ९०१ रुग्ण करोनामुक्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 29, 2020

औरंगाबादमध्ये आतापर्यंत ९०१ रुग्ण करोनामुक्त

https://ift.tt/3cc4SeB
म. टा. प्रतिनिधी, : जिल्ह्यात आणखी ४६ करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे, तर आतापर्यंत ६८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ९०१ बधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्याचवेळी ४८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. ४६ नवीन करोनाबाधितांमध्ये नेहरू नगर, कटकट गेट येथे १, कैलास नगर, माळी गल्ली १, एन-सहा सिडको १, भूषण नगर, पहाडे कॉर्नर १, कैलाश नगर २, श्रीनिकेतन कॉलनी १, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, खंडोबा मंदिर, सातारा गाव २, इटखेडा ३, उस्मानपुरा ३, जुना बाजार १, विश्रांती कॉलनी एन-दोन ३, नारळी बाग गल्ली नं.दोन १, राशेदपुरा, गणेश कॉलनी १, शिवशंकर कॉलनी, गल्ली नं. एक १, बायजीपुरा गल्ली नं. दोन १, एन-चार, विवेकानंद नगर, सिडको १, शिवाजी नगर १, एन सहा, संभाजी कॉलनी १, गजानन नगर एन-११ हडको ५, भवानी नगर, जुना मोंढा १, जुना बायजीपुरा २, किराडपुरा १, रोशनगेट १, राशीदपुरा १, मोतीवाला नगर १, दौलताबाद २, वाळूज सिडको २, राम नगर, कन्नड २ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये १४ महिला व ३२ पुरूष आहेत. उस्मानाबादेत १० करोनाग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात काल, गुरुवारी आणखी दहा जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. पापनास नगर (उस्मानाबाद) येथील ७, बडगा (ता. उमरगा) येथील २ आणि कारी (ता. उस्मानाबाद) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबधितांचा आकडा ६२ वर पोहोचला आहे. 'सारी'चे आतापर्यंत ३७२ रुग्ण औरंगाबाद शहरात सारी या आजाराचे ८ रुग्ण आढळून आले. पालिकेकडून मिळालेल्या अहवालानुसार, आठही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. सारी या आजाराचे आतापर्यंत ३७२ रुग्ण सापडले आहेत. करोनाबरोबरच सारी या आजाराला रोखण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.