बापरे! औरंगाबादमध्ये सकाळपासून ३७ नव्या रुग्णांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 10, 2020

बापरे! औरंगाबादमध्ये सकाळपासून ३७ नव्या रुग्णांची नोंद

https://ift.tt/35Q6WHt
औरंगाबाद: मराठवाड्यातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या औरंगाबादमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून आज शहरात आणखी ३७ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५४५ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात विशेषत: शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील काही भाग करोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. तिथं प्रशासनानं खबरदारी म्हणून लॉकडाऊनचे निर्बंध कठोर केले आहेत. असं असूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ३८ जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नव्याने भर पडलेल्यांमध्ये २२ पुरुष, १५ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये (कंसात रुग्ण संख्या) राम नगर (१९), सिल्क मिल कॉलनी (८), रोहिदास नगर (२), वसुंधरा कॉलनी, एन-७, सिडको (१), चंपा चौक (५), दत्त नगर (१), संजय नगर (१) या परिसराचा समावेश आहे. मृतांची संख्या १३ वर शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील ५० वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा आज सकाळी आठच्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. औषधवैद्यक शास्त्राच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) ३ मे रोजी सकाळी चार वाजता पुढील उपचारासाठी त्याला घाटीत हलवण्यात आले होते. या रुग्णास मधुमेह, किडनीचा आजार होता. मूत्रपिंड सुरळीत काम करत नसल्याने चार वेळा त्याचे डायलिसिस केले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ६ मे रोजी रात्री आठ वाजता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मागील दोन दिवसांपासून रक्तदाब कमी झाल्याने व न्युमोनिया व मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं शहरातील करोना बळींची संख्या आता १३ झाली आहे. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांचा आकडा २० हजारच्याही पुढं गेला आहे. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईतील करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. त्या दृष्टीनं काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलही करण्यात आले आहेत.