'घरातून ठेक्यापर्यंत ने', सोनू सूदला केलं ट्रोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

'घरातून ठेक्यापर्यंत ने', सोनू सूदला केलं ट्रोल

https://ift.tt/2ZCEtDZ
मुंबई- सध्याच्या खडतर काळात प्रत्येकाला आपल्या परिवारासोबत राहण्याचा हक्क आहे; असं म्हणत अभिनेता यानं मुंबईत अडकलेल्या आणि स्वत:च्या मूळ गावी, राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या कामगार आणि मजुरांसाठी प्रवासाची सोय करत आहे. जो पर्यंत शेवटचा मजूर त्यांच्या घरी जात नाहीत तो पर्यंत हे काम सुरुच ठेवणार; असा निश्चयच सोनूनं केला आहे. इतकंच नव्हे तर आता तो विद्यार्थ्यांच्या मदतीला देखील धावला आहे. याच त्याच्या उद्दात कार्यामुळे सर्व स्थरावरून त्याचं कौतुक होत आहे. या काळात तो सोशल मीडियावरही सक्रिय आहे. कोणीही त्याच्याशी संपर्क करू इच्छितो सोनू स्वतः त्यांच्याशी संवाद साधत आहे आणि त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत आहे. दरम्यान, ट्विटरवर काही युझर्सने त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्या सर्वांना सोनूने पुरून उरेल असं उत्तर दिलं. एका युझरने सोनूला टॅग करत लिहिलं की, 'सोनू भाई मी घरी अडकलो आहे. मला दारूच्या ठेक्यापर्यंत सोड.' याचं उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'भावा मी ठेक्यावरून तुला घरी सोडू शकतो. गरज पडली तर सांग.' सोनूच्या या हजरजबाबीपणाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. सोनू सूद मुंबईतील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचं काम करत आहे. त्याच्या या कामाबद्दल अनेकांना माहीत आहे, पण यासाठी त्याला किती मेहनत लागते तसेच किती अडथळे येतात याबद्दल फारसं कोणाला माहीत नाही. काम नीट होत आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी सोनू वळपास १८ तास फोनवर असतो. फोनवरून प्रत्येक गोष्ट नीट होत आहे की नाही हे तो स्वतः पाहतो. या कामासाठी सरकारकडून मान्यता घ्यायलाही त्याला अनेक अडथळे आले. सोनूने 'घर भेजो' या कामाची सुरुवात मैत्रीण निती गोयलच्या मदतीने सुरु केली. ११ मे रोजीपासून सुरू केलेल्या २१ बस सेवांमधून त्याने ७५० मजूरांना कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहे. याशिवाय बिहार आणि यूपीसाठी त्याने १० बस पाठवल्या तर पश्चिम बंगाल, झारखंड आणि आसाम सरकारकडून अजून परवानगी मिळाली नाही. पुढील १० दिवसांमध्ये तो अजून १०० हून जास्त बस मुंबईहून वेगवेगळ्या राज्यांमध्ये रवाना होणार आहेत.