क्वारंटाइन राहण्यास सांगितल्यावरून हाणामारी; दोघांची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 24, 2020

क्वारंटाइन राहण्यास सांगितल्यावरून हाणामारी; दोघांची हत्या

https://ift.tt/3cZyoFt
लातूर: नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकाला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितल्यावरून वाद झाला. त्यावरून नातेवाईकांत तुंबळ हाणामारी झाली. यात दोघांची झाली. ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले की, 'विद्यमान बरमदे हा एरवी मुंबईला वास्तव्याला असतो. तो ट्रक घेऊन गुजरातहून आल्याची माहिती मिळाल्याने बोळेगावातील (ता. निलंंगा) शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला. दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते. तो तिथे गेला. नंतर पहाटे बोळेगावात आल्यावर हाणामारी झाली असून त्यात शत्रुघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील ठार झाले. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले. या प्रकरणी विद्यमान बरमदे याच्यासह आठ जणांविरोधात कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यातील पाच जणांना अटक केली आहे.