लडाखमधील 'हा' भाग आमचाच; चिनी ड्रॅगनचे फुत्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 26, 2020

लडाखमधील 'हा' भाग आमचाच; चिनी ड्रॅगनचे फुत्कार

https://ift.tt/2TEQWTN
बीजिंग: लडाख, ईशान्य भारतातील सीमा भागात चीन आणि भारतीय लष्करांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. दोन्ही सैन्यांमध्ये वादावादी, दगडफेकीच्या घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. सीमा प्रश्नावर चीन आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र असून काश्मीरमधील गलवान खोरे भाग हा चीनचा भाग असल्याचा दावा केला आहे. सीमा भागात आक्रमक भूमिका घेणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा सुरू आहे. चीन सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने सीमा भागात भारतच जाणूनबुजून अशांतता पसरवत असल्याचे म्हटले आहे. चिनी सैन्याकडून लडाख भागात हालचाली वाढल्या आहेत. त्यातच गलवान खोऱ्यात चीनने तंबू उभारले असून बंकर बनवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चीनच्या या कृत्यानंतर भारतीय सैन्यानेदेखील या भागात सुरक्षितेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर चीनने भारताविरोधात थयथयाट सुरू केला आहे. वाचा: गलवान भागात सुरू असलेला वाद हा भारताने जाणूनबुजून सुरू केला असल्याचा आरोपही 'ग्लोबल टाइम्स'ने केला आहे. गलवान भाग हा चीनचा भाग आहे, भारताला ठाऊक असतानाही त्यांनी वाद उकरून काढला असल्याचे 'ग्लोबल टाइम्स'ने म्हटले आहे. अमेरिका आणि चीनचे संबंध सध्या चांगले नसले तरी १९६२ च्या तुलनेत चीनची स्थिती खूपच चांगली असल्याचे चीनने म्हटले आहे. वाचा: भारत आणि चीनमध्ये ३५०० किमीची वास्तविक नियंत्रण रेषा आहे. या भागात दोन्ही देशांचा दावा आहे. अनेकदा या भागात दोन्ही सैन्यांमध्ये वादावादीदेखील झाली आहे. भारत आणि चीनमध्ये १९६२ मध्ये सीमा प्रश्नावरून युद्ध झाले होते. काश्मीरमधील एक भाग चीनच्या ताब्यात आहे. आणखी वाचा: