पुण्यात 'या' भागात भरले पाणी; आणखी दोन दिवस राहणार पावसाचा जोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 4, 2020

पुण्यात 'या' भागात भरले पाणी; आणखी दोन दिवस राहणार पावसाचा जोर

https://ift.tt/2zPv9Cs
पुणे: '' चक्रीवादळाच्या परिणामामुळे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याला बुधवारी वादळी वारे आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि '' शिथील झाल्यानंतरही बहुसंख्य पुणेकरांना घरीच थांबवून ठेवले. शहरात ठिकठिकाणी साठहून अधिक, तर पिंपरीत ५४ झाडे पडली. या पावसाने दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. या वादळात पुणे जिल्ह्यात दोन जणांचा बळी गेला असून रात्रीही आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता. दरम्यान, आणखी दोन दिवस शहर आणि परिसरात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. 'निसर्ग' चक्रीवादळामुळे शहर आणि परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी सकाळीही संततधार सुरूच होती. वादळी वाऱ्यांमुळे आपटे रस्ता, , कोथरूडसह अनेक भागांमध्ये सुमारे ६० झाडे कोसळली, त्यामुळे वाहतूक मंदावली होती. तसेच सातारा रस्त्यावर एक होर्डिंग कोसळले. पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर तळी साचली होती. झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या, तसेच भूमीगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जवळपास ५४० वाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित होऊन हजारो घरांमधील बत्ती गुल झाली. 'लॉकडाउन'मुळे घरूनच काम करणाऱ्या (वर्क फ्रॉम होम) नागरिकांचे मात्र त्यामुळे हाल झाले. तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर (वय ५२) यांच्या घराचा एक पत्रा उडाला. उर्वरीत पत्रे धरून ठेवण्यासाठी ते गेले असताना पुन्हा सोसाट्याचा वारा सुटला आणि ते पत्र्यासह दूर उडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर खेडमधील वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले (वय ६५) यांचा भिंत कोसळून मृत्यू झाला. तसेच वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली. वेल्हे तालुक्यात तीन शाळा व एका ग्रामपंचायतीच्या छतावरील पत्रे उडून गेले. तालुक्यात ७९ घरांचे नुकसान झाले असून ३६ झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. कोंढवा भागात रस्ते जलमय झाले होते. जिल्ह्यात बत्ती गुल निसर्ग वादळाचे थैमान आणि मुसळधार पावसामुळे बुधवारी शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. विद्युत यंत्रणेवर मोठी झाडे आणि फांद्या कोसळल्याने सुमारे ५४० वीजवाहिन्यांचा पुरवठा बंद पडला. त्यामुळे पुणे शहराच्या विविध भागांत, तसेच पिंपरी-चिंचवड आणि भोसरीतील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले होते. पुणे शहरात रास्ता पेठ, एनआयबीएम रोड, खडी मशिन चौक, कोंढवा, उंड्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागात ८५ वीजवाहिन्यांचा पुरवठा विस्कळीत झाला. पिंपरी-चिंचवड आणि भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे ११२ वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्यात मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमधील ३४० वीजवाहिन्यांचा पुरवठा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले.