
मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये अधूनमधून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून शिवसेनेनं केंद्र सरकारला जोरदार टोले हाणले आहेत. 'दिल्लीत इतके मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्यात शांततेचा चोथा का झाला आहे? दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या आजोबांच्या छातीवर बसून रडणार्या नातवाचे चित्र ही केंद्र सरकारची नामुष्की आहे. हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. ( takes a jibe at Modi Sarkar over terrorist attacks in Kashmir) वाचा: काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात ‘सीआरपीएफ’चा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात त्याच परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक मारला गेला. त्यावेळी त्याचा नातू सोबत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांच्या छातीवर बसून हा नातू त्यांना उठवत राहिला. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व दहशतवादाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला. केंद्रातील काही मंत्र्यांनीच हे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले. त्यावरून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर हल्ला चढवला आहे. 'जेव्हा सरकारचा अधिकृत मंत्रीच त्याच्या ट्विटर हँडलवर अशी छायाचित्र टाकतो, तेव्हा कश्मीर खोर्यातील रक्तपाताची जबाबदारी सरकारवर येते. अजाण नातू मृत आजोबांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय अशी विदारक छायाचित्रे आजवर फक्त सीरिया, इजिप्त, सोमालिया, अफगाणिस्तानसारख्या देशांतील विध्वंसानंतर समोर आली आहेत. हे चित्र प्रसिद्ध करणार्या केंद्रीय मंत्र्यांना एक कळायला हवे की हे चित्र म्हणजे केंद्र सरकारची नामुष्की ठरू शकेल. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?,' असा सवालही शिवसेनेनं केला आहे. 'नोटाबंदी केल्याने कश्मीर खोर्यातील अतिरेकी चळवळीस लगाम बसेल, बनावट नोटांचा सुळसुळाट थांबेल, असे ठासून सांगितले गेले ते फोल ठरले. ३७० कलम हटवून आणि कश्मीरचे विभाजन करूनही प्रश्न जैसे थे आहेत. अजूनही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. यांनी गृहखात्याचे नेतृत्व हाती घेताच कश्मीर खोर्याचा वाजतगाजत दौरा केला. पण गेल्या सहा महिन्यांत अतिरेक्यांच्या कारवाया आणि हल्लेही वाढले. घुसखोरीचे प्रमाण वाढलेच आहे. तेव्हा सरकारने कश्मीरातून फुटीरतावादी, घुसखोरांना बाहेर काढायलाच हवे. लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांनाही हाकलून दिले पाहिजे. कश्मीर खोर्यात एका मृत आजोबांच्या छातीवर बसून चिमुरडा नातू रडत आहे, बाजूला बंदुकांच्या फैरी झडत आहेत हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे,' असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.