वीज क्षेत्रातील महत्त्वाचे कंत्राट चीनी कंपनीला; काँग्रेसचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 29, 2020

वीज क्षेत्रातील महत्त्वाचे कंत्राट चीनी कंपनीला; काँग्रेसचा दावा

https://ift.tt/333EDWB
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) वीजेच्या क्षेत्रात एका चीनी कंपनीला () कंत्राट दिल्याचे सांगून पक्षाने केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत 'रिमोट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी'चे कंत्राट ( technology) 'डोंगफेंग' या चीनी कंपनीला देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. देशात चिनी कंपनीच्या अपवर बंदी घातली जात असताना हे महत्त्वपूर्ण कंत्राट चीनी कंपनीला का देण्यात आला, असा सवाल पक्षाचे प्रवक्ते (Pavan Khera) यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या या दाव्यावर सध्या भाजपा किंवा सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. खेडा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे. डोंगफेंग नावाची कंपनी जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे आणि पाकिस्तानशी त्यांचे विशेष संबंध आहेत. ही कंपनी पॉवर ग्रिड्स, स्मार्ट मीटर, मीटरमध्ये स्थापित रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान इत्यादींमध्ये सर्वसमावेशक उपायांसाठी प्रसिध्द आहे, अशी माहितीही पवन खेडा यांनी दिली आहे. वाचायलाच हवे असे- जम्मू-काश्मीरमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट ज्या कंपनीला मिळाले आहे, त्या कंपनीने डोंगफेंगला रिमोट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे कंत्राट दिले आहे, असे सांगत खेडा यांनी काही कागदपत्रे प्रसिद्ध केली. स्मार्ट मीटरमधील सर्वात महत्त्वाचे भाग रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा रिमोट कम्युनिकेशन सिस्टम आहे. जर अशी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील कामे, अत्यंत संवेदनशील क्षेत्रात केलेली कार्ये एखाद्या चीनी कंपनीला आणि थेट चीन सरकारला आणि सैन्याला कळविणार्‍या कंपनीलाच मिळाली तर हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय बनतो, असेही खेडा म्हणाले. वाचा: सीमावर्ती भागात उर्जेसारख्या रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात वादग्रस्त चिनी कंपनीला येण्याची परवानगी का देण्यात आली आहे?, असा सवाल पवन खेडा यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे चीनी कंपन्यांच्या अॅपवर बंदी घातली जात आहे, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील लोकांचा महत्त्वाचा डेटा एखाद्या चिनी कंपनीच्या हाती का दिला जात आहे, हे असे का असेही खेडा यांनी विचारले आहे. वाचा: