नवी दिल्ली : देशातील संक्रमणाच्या आकड्यानं आता १६ लाखांचा टप्पा ओलांडलाय. भारतातील आता १६ लाख ३८ हजार ८७० वर पोहचला. यातील ५ लाख ४५ हजार ३१८ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत तर १० लाख ५७ हजार ८०६ जणांनी करोनावर मात केलीय. आत्तापर्यंत ३५ हजार ७४७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात ५५ हजार ०७९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळलेत तर ७७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ''च्या माहितीनुसार, देशात ३० जुलैपर्यंत देशात १ कोटी ८८ लाख ३२ हजार ९७० सॅम्पल्सची चाचणी करण्यात आल्या. कालच्या एका दिवसात ( गुरुवारी ) देशात ६ लाख ४२ हजार ५६६ सॅम्पल्सची चाचण्या पार पडल्या. वाचा : वाचा : वाचा : देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या ८.५७ टक्क्यांवर आहेत. म्हणजेच, देशात जेवढ्या चाचण्या पार पडत आहेत त्यातील ८.५७ टक्के करोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. देशात प्रत्येक दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत एक लाख प्रकरणांची भर पडताना दिसतेय. करोना संक्रमणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू आणि तिसऱ्या स्थानावर राजधानी दिल्ली आहे. देशात जवळपास प्रत्येक दिवशी पाच लाखांच्या आसपास चाचण्या पार पडत आहेत, येत्या एक-दोन महिन्यांत ही संख्या दुप्पट होईल, असं आश्वासनही विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ. हर्षवर्धन यांनी दिलंय. देशात पहिला करोना रुग्ण ३० जानेवारी रोजी सापडला होता. आता सहा महिने उटलटून गेले असले तरी अद्याप कोविड १९ विरुद्ध लढाई सुरू आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय. देशात सहा महिन्यांपूर्वी व्हेन्टिलेटरची आयात करावी लागत होती आता मात्र देशातच तीन लाख व्हेन्टिलेटर निर्माणाची क्षमता तयार झालीय. भारत जवळपास १५० देशांना 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' या औषधाची निर्यात करत आहे, असंही हर्षवर्धन यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं होतं. वाचा : वाचा : वाचा :