कानपूरमध्ये पोलिसांवर मोठा हल्ला; चकमकीत ८ पोलिस शहीद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 3, 2020

कानपूरमध्ये पोलिसांवर मोठा हल्ला; चकमकीत ८ पोलिस शहीद

https://ift.tt/2YVGJWo
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंडांनी गोळीबार केला. यात एक पोलिस उपअधीक्षकासह ८ पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. या हल्ल्यात इतर ७ पोलिस जखमी झाले आहेत. कानपूरमधील चौबैपूर पोलिस ठाणे क्षेत्रात पोलिसांचे हे पथक बिकरू या गावात विकास दुबे या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. या वेळी गावात उपस्थित असलेल्या सर्व गुंडांनी पोलिसांना सर्व बाजूंनी घेरले आणि गोळीबार करणे सुरू केले. यात झाले. विकास दुबे याने सन २००१ मध्ये राजनाथ सिंह सरकारमध्ये मंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची पोलिस ठाण्यात घुसून हत्या केली होती. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस महासंचालक आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी फोनवर चर्चा केली. ८ पोलिस कर्मचारी शहीद शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बिल्हौरचे सर्कल अधिकारी देवेंद्र मिश्र, शिवराजपूरचे ठाणे अंमलदार महेश यादव, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि ४ शिपायांचा समावेश आहे. यात ७ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यांपैकी अनेक पोलिस कर्मचारी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस हत्येच्या प्रकरणात पोलिस विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेले होते. विकास दुबे याच्याविरोधात ६० गुन्हे दाखल आहेत. चकमकीत शहीद झालेले पोलिस कर्मचारी: १. देवेंद्र कुमार मिश्र- सीओ बिल्हौर २. महेश यादव- एसओ शिवराजपूर ३. अनूप कुमार- चौकी प्रमुख, मंधना ४. नेबूलाल- पोलिस उपनिरीक्षक, शिवराजपूर ५. सुलतान सिंह- हवालदार, चौबेपूर ६. राहुल- हवालदार, बिठूर ७. जितेंद्र- हवालदार, बिठूर ८. बबलू- हवालदार बिठूर कशी घडली घटना? उत्तर प्रदेशची डीजीपी एस. सी. अवस्थी यांनी माहिती देताना सांगितले की, विकास दुबेविरुद्ध काही दिवसांपूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस विकास दुबेला अटक करण्यासाठी गेले होते. पोलिसांचे हे पथक गावाजवळ पोहोचताच तेथे जेसीबी लावण्यात आली. यामुळे पोलिसांची गाडी गावात शिरू शकली नाही. गाडी आत शिरू न शकल्याने पोलिस गावाच्या बाहेरच उतरले. त्यावेळी अगोदरपासूनच गावातील गुंड दबा धरून बसले होते. अचानक गुडांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही गोळीबार करत प्रत्यु्त्तर दिले. मात्र हे गुंड उंचावर होते. त्यामुळे त्यांच्या गोळ्या पोलिसांना लागल्या. यात ८ पोलिस शहीद झाले, असे डीजीपी अवस्थी यांनी माहिती देताना सांगितले. चकमकीत २ गुंडही ठार या चकमकीत विकास दुबेच्या साथीदारांपैकी दोन गुंड पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांजली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांनी अपरिमित साहस आणि अद्भुत कर्तव्यनिष्ठा दाखवली असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.