देवेंद्र फडणवीस यांनी हे कायम लक्षात ठेवावं: नारायण राणे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 4, 2020

देवेंद्र फडणवीस यांनी हे कायम लक्षात ठेवावं: नारायण राणे

https://ift.tt/2C4ziDf
मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय झालं हे यांनाच माहीत असेल. पण शरद पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव दुसऱ्या पक्षाला दिला नसेल याची शाश्वती नाही. राजकीयदृष्ट्या पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही हे फडणवीसांनी कायम लक्षात ठेवावं,' असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार यांनी दिला आहे. ('s advice to ) राज्यातील करोनाची परिस्थिती व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींबद्दल ते 'बीबीसी मराठी'शी बोलत होते. २०१९च्या निवडणुकीनंतर थेट शरद पवार यांच्याकडून भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऐनवेळी पवारांनी वेगळी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी अलीकडंच केला होता. त्याबद्दल राणे यांनी आपलं मत मांडलं. 'राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे. शरद पवार हे काहीही घडवू शकतात,' असं राणे म्हणाले. भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसला एकाकी पाडण्यासाठी केलं होतं, असं मी मानत नाही. पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यामुळं त्यांना अनेक गोष्टी माहीत आहेत. त्यातून राष्ट्रीय भावनेतून ते बोलले असावे,' असंही राणे म्हणाले. हे सरकार बदलल्याशिवाय जाणार नाही! राज्यातील करोनाच्या स्थितीवरून नारायण राणे यांनी यांच्या सरकारवर हल्ला चढवला. 'करोनाचा रोखण्यात राज्य सरकार पुरतं अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. लोकांचे मृतदेह ठेवायला जागा नाही. रुग्ण वाढत आहेत. जनतेची सुरक्षा करण्यास हे सरकार असमर्थ आहे. लॉकडाऊन घोषित केलं जात पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. देशातील करोना रुग्णांचे आकडे महाराष्ट्रामुळं वाढलेले आहेत. जनता बेजार झाली आहे. हे सरकार बदलल्याशिवाय करोना जाणार नाही,' अशी टीका राणेंनी केली. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री पाहिला नाही! 'राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव मुख्यमंत्र्यांना नाही. सरकारमध्ये आपसात मतभेद आहेत. त्यामुळं सरकारी यंत्रणांवर अंकुश नाही. घरात बसून आदेश काढले जातात. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजवर पाहिला नाही,' असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला. महाराष्ट्र भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.