मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 6, 2020

मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा

https://ift.tt/2PpzqAC
मुंबई: मुंबईत काल चार तासात ३०० मिमी विक्रमी पडला. गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच काल मुंबईतील काही भागांत एकप्रकारचे वादळच आले होते, असं मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त यांनी सांगितलं. पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ आज भिंत खचून सुमारे ५० वृक्ष उन्मळून पडले. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त आय. एस. चहल आले होते. या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. पण संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हतं. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, असं चहल म्हणाले. काल कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. मुंबईत चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. पण असा पाऊस कधीच पाहिला नाही. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रस्त्यावर आणि रेल्वेरुळावर पाणी साचल्याने अनेक लोक अडकून पडले होते. आम्ही रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दोघांच्या समन्वयाने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. पालिकेने या लोकांच्या राहण्याची पालिकेच्या शाळेत व्यवस्था केली होती. त्यांना पालिकेकडून भोजनही देण्यात आले. आता मुंबईतील पाणी ओसलं आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे. हिंदमाता परिसरातही पाणी तुंबलेलं नाही. काल जेजे रुग्णालयात संध्याकाळी ७ वाजता पाणी भरलं होतं. संध्याकाळी १० वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा निचरा केला, असंही ते म्हणाले. वाचा: मेट्रोला क्लिनचिट यावेळी चहल यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली. साधारणपणे ६५ मिमी पाऊस पडला तरी अतिवृष्टी झाली असं मानलं जातं. इथं तर ३०० मिमी पाऊस पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचं आपण बोलू शकलो असतो. पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली.