भोपाळ : सोशल मीडियावर एका चहावाल्याला झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांवर मोठी टीका होतेय. या व्हिडिओनंतर मध्य प्रदेशात राजकीय प्रतिक्रियांमुळे वादात आणखीनच भर पडलीय. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातल्या राजपूर तालुक्यातील ही घटना आहे. या व्हिडिओत पोलीस एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. तर 'वाहे गुरु जी की खालसा वाहे गुरु जी की फतेह' म्हणत हा व्यक्ती पोलीस आपल्यावर अत्याचार करत असल्याचं जोरजोरात ओरडून सांगताना दिसतोय. या व्यक्तीचं नाव प्रेम सिंह असल्याचं समंजतंय. छोटीशी टपरी टाकून त्यावर चहा विकण्याचा प्रेम सिंहचा धंदा आहे. दिला म्हणून पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. आपल्याला टपरी लावू दिली जात नसल्याचंही प्रेम सिंहनं म्हटलंय. वाचा : वाचा : मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावलेत. घटना घडली तेव्हा हा व्यक्ती होता. चहाची टपरी लावण्यावरून प्रेम सिंह, त्याचे कुटुंबीय आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेचा झाल्यानंतर ताबडतोब दोन पोलीस कर्मचाऱ्यांववर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणात दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचं सांगितलंय. यात एक एएसआय आणि एका हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. यातच या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया समोर येतानाच या प्रकरणाला देण्याचाही प्रयत्न झालेला दिसतोय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेचा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना 'मध्य प्रदेशच्या बडवानीच्या पलसूदमध्ये प्रेम सिंह ग्रंथी गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस चौकीजवळ एक छोटं दुकान लावून आपलं पोट भरतात. इथं पोलिसांनी अमानवीय पद्धतीनं त्यांना मारहाण करून त्यांची पगडी फेकून दिली, त्यांचे केस पकडून त्यांना रस्त्यावरच मारहाण करण्यात आली', असं म्हटलंय. वाचा : वाचा : 'हा अत्याचार आणि गुंडागर्दी शिख धर्माच्या पवित्र धार्मिक परंपरांचादेखील अपमान आहे. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी मी सरकारकडे मागणी करतो' असं कमलनाथ यांनी म्हटलंय. तर, 'आज मध्य प्रदेशात कायदे व्यवस्थेची अराजकता पसरलीय. गुरू ग्रंथ साहेबमध्ये पगडीचा मान आणि सन्मान आहे. पवित्र आहे. धर्माच्या आधारावर राजकारण करणारे लोक अधार्मिक काम करत आहेत. सरकार दिशाहीन आहे. अत्याचारी आहे आणि लोकांना भरकटवण्याचं काम केलं जातंय' असं माजी मंत्री जीतू पटवारी यांनी म्हटलंय. दरम्यान, बडवानीचे पोलीस अधीक्षक निमिष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम सिंहवर अगोदरपासूनच चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. वाहन तपासणी दरम्यान आरोपीचा पोलिसांसोबत वाद झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. वाचा : वाचा :