कोकणातील गणपती विशेष रेल्वे गाड्यांना राज्य सरकारचा रेड सिग्नल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 11, 2020

कोकणातील गणपती विशेष रेल्वे गाड्यांना राज्य सरकारचा रेड सिग्नल

https://ift.tt/31CfS1D
कमल मिश्रा/शशांक रावमुंबई: कोकणातील गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा स्वत:चाच प्रस्ताव राज्य सरकारनं तूर्त गुंडाळून ठेवला आहे. राज्य सरकारनं मध्य रेल्वेला तसं तोंडी कळवलं आहे. मात्र, मध्य रेल्वेनं राज्य सरकारकडून ही सूचना लेखी मागवली आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या नियमांमुळं कोकणातील चाकरमान्यांना वेळेवर गावाकडे पोहोचणे आवश्यक आहे. राज्य सरकारनं यासाठी तात्काळ व्यवस्था करावी, अशी ओरड सातत्यानं सुरू होती. याची दखल घेऊन राज्य सरकारनं एसटीच्या बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णयही सरकारनं घेतला होता. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेला कोकणातील विविध जिल्ह्यासांठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानुसार ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार होत्या. रेल्वेनं तशी तयारी सुरू केली. नियोजित वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडीसाठी गाड्या सोडल्या जाणार होत्या. हे प्रस्तावित वेळापत्रक शुक्रवारी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलं. रेल्वे बोर्डानं ते तात्काळ मंजूर करून १९० गणपती विशेष गाड्या सोडण्याची परवानगी दिली होती. मात्र, सोमवारी अचानक राज्य सरकारकडून गाड्या सोडू नयेत, असं तोंडी कळवण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत गाड्या सुटणार की नाही, हे स्पष्ट झालेलं नव्हतं. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार, 'कोकणात गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही फक्त राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत.' वाचा: