बैरूत: मागील आठवड्यात लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटामुळे जगभरात खळबळ उडाली झाली. या घटनेनंतर बैरूतमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. आता जनआंदोलनाच्या रेट्यापुढे लेबनॉन सरकारने गुडघे टेकले असून संपूर्ण सरकारने राजीनामा दिला आहे. पंतप्रधान हसन दिआब यांनी आपल्या मंत्रिमंडळाची राजीनामा राष्ट्रपती माइक अउन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. बैरूत बंदरात झालेल्या भीषण स्फोटामुळे बंदर आणि जवळील परिसर उद्धवस्त झाले. या भागातील निवासी इमारतीही कोसळल्या. या स्फोटाच्या घटनेत १५० हून अधिकजण ठार झाले आहेत. तर, पाच हजारांहून अधिकजण मृत्यूमुखी पडले आहेत. या भीषण स्फोटानंतर संतप्त नागरिकांनी दोन दिवस सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. ही घटना सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारामुळे झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. सुरुवातील तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. सोमवारी, भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा लेबनॉनच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या सरकारचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला आहे. हसन दियाब यांनी जानेवारी महिन्यातच पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली होती. त्यानंतर सातत्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. वाचा: लेबनॉनमध्ये आधीपासून आर्थिक अरिष्ट सुरू झाले होते. त्यातच करोनाच्या संसर्गामुळे लेबनॉनच्या अडचणीत वाढ झाली. सरकारच्या धोरणाविरोधात लोकांमध्ये संताप होता. बैरूत बंदरात झालेल्या स्फोटानंतर लोकांच्या संतापाचा मात्र उद्रेक झाला. हजारो लोकांनी बैरूतच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. पोलिसांच्या कारवाईत काही आंदोलक जखमी झाले आहेत. तर, एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सरकारी कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. रस्त्यावर जाळपोळीच्याही घटना घडल्या. पाहा: वाचा: दरम्यान, या भीषण स्फोटाची चौकशी सुरू असून लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी सीमा शुल्क विभागाचे महासंचालक बद्री डाहर, माजी संचालक चाफिक मरही आणि बैरूत पोर्ट ट्रस्टचे महासंचालक हसन कोरयतेम यांच्यासह १९ जणांचा अटक करण्यात आली आहे. बंदरात झालेल्या स्फोटानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. त्या अनुषंगाने सीमा शुल्क आणि बंदर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. आधी १६ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.