आंदोलनकर्त्या खासदारांसाठी 'चहा'; उपसभापतींची गांधीगिरी फसली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 22, 2020

आंदोलनकर्त्या खासदारांसाठी 'चहा'; उपसभापतींची गांधीगिरी फसली!

https://ift.tt/32SjEWm
नवी दिल्ली : कृषि विषयक विधेयकांवर राज्यसभेत गोंधळ घातल्यानंतर निलंबित करण्यात आलेले आठही खासदार रात्रभर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलनावर बसून राहिले. सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसदेत गोंधळ घालण्यासाठी आणि उपसभापतींसोबत गैरवर्तन करण्यासाठी निलंबित केलं होतं. सोमवारी दुपारपासून धरणे आंदोलनावर बसलेल्या या खासदारांच्या भेटीसाठी मंगळवारी सकाळी उपसभापती स्वत: पोहचले. हरिवंश यांनी 'गांधिगिरी' करत या खासदारांसाठी आपल्यासोबत चहादेखील आणला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा चहा पिण्यासही नकार दिल्यानं त्यांची ही फसली. यावेळी त्यांनी नाराज खासदारांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. उपसभापतींचा एक दिवस उपवास यानंतर राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे आपण दु:खी झाल्याचं सांगत हरिवंश यांनी एका दिवस उपवासावर बसणार असल्याचं जाहीर केलंय. उपसभापतींनी या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून याबद्दल माहिती दिलीय. उपसभापतींकडून चहा घेण्यास आंदोलकांचा नकार निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये डेरेक ओ'ब्रायन (तृणमूल काँग्रेस), संजय सिंह (आम आदमी पक्ष), राजीव सातव (काँग्रेस), के के रागेश (सीपीआई-एम), रिपुण बोरा (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस) या खासदारांचा समावेश आहे. वाचा : वाचा : या खासदारांनी उपसभापतींनी आणलेला चहा पिण्यास नकार दिला. 'जेव्हा देशातील हजारो शेतकरी उपाशी-तापाशी या काळ्या कायद्याविरोधात रस्त्यांवर उतरले असताना आम्ही वैयक्तिक नातेसंबंध कसे जपू शकतो. हरिवंश आमच्या घरी आलं तर नक्कीच आम्ही आमचे वैयक्तिक संबंध जपू पण इथे मात्र आम्ही शेतकऱ्यांसाठी बसलेलो आहोत' असं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एका चॅनलशी संवाद साधताना म्हटलंय. 'तर सरकारच्या वतीनं कुणीही आमची विचारपूस करण्यासाठी आलेले नाहीत. मात्र विरोधी पक्षाचे अनेक नेते आले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबाही दिला. आम्ही हे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत', असं काँग्रेसचे खासदार रिपून बोरा यांनी म्हटलं. वाचा : वाचा : मोदींनकडून उपसभापतींचं कौतुक याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपसभापती हरिवंश यांचं कौतुक केलंय. 'ज्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि अपमानित केलं, त्याच लोकांसाठी हरिवंश जी चहा घेऊन गेले आहेत. हीच त्यांची महानता दर्शवत आहे' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. भाजप खासदारांना व्हिप भाजपने मंगळवारी आपल्या खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे राज्यसभेत आज एक महत्त्वपूर्ण विधेयक सरकारच्या माध्यमातून आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. वाचा : वाचा :