बाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 1, 2020

बाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार

https://ift.tt/3iiubi9
अयोध्या: अयोध्येतील बाबरी मशिदीचे () अवशेष ६ डिसेंबर १९९२ ला पाडले गेले. त्यापूर्वी ५ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत रात्री १० वाजता बजरंग दलाचे नेते आणि तत्कालीन खासदार (Vinay Katiyar) यांच्या घरी डिनरचे आयोजन केले गेले होते. या डिनरला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) आणि इतर स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित होते. सीबीआयने आपल्या तपासात विनय कटियार यांचे नाव समाविष्ट केले आणि त्यांच्यावर कट रचण्याचा आरोप लावला. कोर्टाने मात्र सीबीआयचा हा आरोप मान्य केला नाही. आपण तेथे केवळ प्रतिकात्मक कारसेवेबाबत योजना तयार केली होती, असे कटियार यांचे म्हणणे आहे. मशीद पाडण्याबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झालेली नव्हती, असे ते पुढे म्हणाले. (no other mosque will be touched in future said ) विनय कटियार यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, आडवाणी रात्री अयोध्येत पोहोचले. ते जानकी महलमध्ये थांबले होते. ते माझे नेते असल्याने मी त्यांना माझ्या घरी रात्रीच्या भोजनासाठी घरी बोलावले. आम्ही तेथे सांकेतिक कारसेवेबाबत चर्चा केली. बाबरी मशिदीजवळ कोणत्याही प्रकारची कारसेवा होणार नाही, असेही आम्ही ठरवले होते. 'काँग्रेसने रचले कारस्थान' उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पडावे या उद्देशाने काँग्रेसने बाबरी मशिदीचे अवशेष पाडले, असे विनय कटियार म्हणाले. भविष्यात कोणत्याही मशिदीला हात लावला जाणार नाही, असे ते म्हणाले. शांतात राखावी. काँग्रेसने पाडली आणि आम्हाला आरोपी करण्यात आले. हे एक कारस्थान होते आणि ते काँग्रेसने केले. उत्तर प्रदेशातील आमचे सरकार पडावे हाच त्यामागील उद्देश होता. आम्ही बाबरी मशिदीचे अवशेष कधीही पाडू इच्छित नव्हतो, असे कटियार म्हणाले. 'गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तेथे आले' आमचे कारसेवक शिस्तबद्ध होते. मात्र तेथे मोठे कारस्थान रचले गेले. काही अनोळखी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तेथे आले आणि त्यांनी बाबरी मशिदीवर चढून अवशेष पाडले. आम्ही आमच्या कारसेवकांना शरयू नदीतून रेती आणण्यास सांगितले होते. तेथील परिस्थिती अनियंत्रित कशी झाली याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती,असे विनय कटियार यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी चौकशी होऊन काँग्रेसच्या भूमिका काय होती हे स्पष्ट व्हायला हवे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आमची काशी आणि मथुरेसाठीच्या आंदोलनाची कोणतीही तयारी नसल्याचेही कटियार म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-