'त्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत'; राज्यमंत्री सिंह भडकले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 30, 2020

'त्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत'; राज्यमंत्री सिंह भडकले

https://ift.tt/3kH2pO5
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यामागे (Terrorist attack in Pulwama) आपला हात असल्याचे पाकिस्ताने स्वीकारल्यानंतर या हल्ल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते हल्लाबोल करू लागले आहेत. माजी लष्कर प्रमुख आणि मोदी सरकारमधील विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह () यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारनेच हा हल्ला घडवून आणला असेल असे बोलणाऱ्या आणि भगव्या दहशतवादाबाबत टिप्पणी करणाऱ्यांवर लोकांनी विश्वास ठेवता कामा नये. उलट मी असे म्हणेन की अशांना खुलेआम जोडे मारले पाहिजेत', असे वक्तव्य यांनी केले आहे. १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा येथे सुरक्षादलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पुलवामा हल्यामागे पंतप्रधान मोदी यांचा हात आहे, कारण त्यांना निवडणूक जिंकायची आहे, असा आरोप जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला होता. बालाकोट हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या पुराव्यांचा तपास आणि खुलासा करण्यासाठी एक संयुक्त राष्ट्र समिती गठित केली जावी अशी विनंती भारताने करावी, अशी सूचनाही अब्दुल्ला यांनी केली होती. क्लिक करा आणि वाचा- पाकिस्तानने काय म्हटले? पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता असे पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमधील एक मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले होते. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचे यश आहे, असे ते म्हणाले. पुलवामा हल्ल्याचे श्रेय त्याने इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला दिला. पुलवामा हल्ला ही इम्रान खान यांची एक कामगिरी आहे, असेही ते म्हणाले होते. मात्र, या वक्त्वव्यावर वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-