नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळवल्यानंतर '' () संघटनेचा आत्मविश्वास दुणावलाय. यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते यांनी बिहारच्या विजयानंतर सगळ्या भारतात पक्षाचे झेंडे फडकताना दिसेल, अशी आशा व्यक्त केलीय. बिहारमध्ये एआयएमआयएमच्या विजयानंतर हिंदुस्तानच्या राजकारणात नवी तारीख लिहली जाईल, सगळ्या हिंदुस्तानात आपला झेंडा फडकावताना सगळं जग पाहील, असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलंय. वाचा : वाचा : बिहार विधानसभेचा निकाल आल्यानंतर एआयएमआयएमचे सगळे आमदार पाटण्यात दाखल झालेत. सत्तास्थापनेच्या खेळात आपलाही सहभागी नोंदविण्यासाठी एआयएमआयएम प्रयत्नशील आहे. दरम्यान, पक्षाकडून आपल्या पाचही आमदारांना हैदराबादला आमंत्रित करण्यात आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष विखुरण्यापासून वाचवण्यासाठी ओवैसी यांनी आपल्या आमदारांना हैदराबादला बोलावलंय. 'मित्र आणि शत्रुंना ओळखा, आपल्या आणि परक्यांमध्ये फरक ओळखायला शिका, परिस्थिती ओरडून सांगतेय की एक व्हा' असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमात म्हटलं. वाचा : वाचा :