नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) () आणि विरोधी पक्षांची महाआघाडी अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून पक्षाचे ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात अनुभवी, संघटनात्मक स्तरावर अनुभवी आणि राजकीय परिस्थितीचे आकलन असलेल्या नेत्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री () यांनी पक्षाकडे केली आहे. आता पक्षाची आत्मचिंतनाची वेळ संपलेली असल्याचेही सिब्बल म्हणाले. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्हाला अनेक स्तरांवर अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. संघटनेच्या स्तरावर, प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची मते मांडण्याच्या स्तरावर अशा लोकांना आणा ज्या लोकांना लोक ऐकू इच्छितात. या बरोबरच आपले मुद्दे अतिशय सावधपणे जनतेपुढे मांडू शकणाऱ्या सतर्क नेतृत्वाची पक्षाला गरज आहे, असे सांगत सिब्बल यांनी आपण शक्तिहीन झाल्याचे आता पक्षाने मान्य करायला हवे, असा सल्लाही पक्षाला दिला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबाबतही सिब्बल यांनी मत व्यक्त केले आहे. ज्या राज्यांमध्ये सत्तापक्षाचा पर्याय आहे, तेथे देखील जनतेने काँग्रेसबाबत जेवढा विश्वास दाखवायला हवा होता तेवढा तो दाखवलेला नाही, असे सिब्बल म्हणाले. आत्मचिंतनाची वेळ आता संपलेली असून आम्हाला उत्तर माहीत आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस आणि ईच्छा काँग्रेस पक्षात असायला हवी, असेही सिब्बल पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा बातमी - पक्षनेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैकी सिब्बल एक आहेत. या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. यानंतर पक्षात मोठी चर्चा सुरू झाली. मात्र यानंतर देखील काँग्रेसमध्ये कोणताही बदल झाला नाही. उलट पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचे महत्व कमी करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा बातमी - क्लिक करा आणि वाचा बातमी-