मुंबई: 'मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे. हा मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे,' अशी जहरी टीका शिवसेनेनं यांच्या अटकेच्या निमित्तानं भाजपवर केली आहे. ( leaders for supporting Arnab Goswami) प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी 'रिपब्लिक टीव्ही'चे मालक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णव यांच्या अटकेमुळं अस्वस्थ झालेल्या भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. भाजपच्या या भूमिकेचा शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: महाराष्ट्रात २०१८ साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपचे पुढारी वेडेखुळेच बनले. आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी, त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायलाच हवी, पण भाजपला असे कायद्याचे राज्य मान्य नाही. मुळात त्यांना कायदाच मान्य नाही असे भरकटलेले वर्तन ते करीत आहेत. वाचा: '' मनाने भरकटलेले प्रे. ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजप पुढारी वागू लागले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होताना दिसत आहेत, पण ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बसून दादागिरीची भाषा सुरू केली आहे. तद्दन खोटय़ा बातम्या पसरवून पदाची नाचक्की करत आहेत. ट्रम्प यांचे वर्तन कायद्यास व अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही. तशीच अप्रतिष्ठा महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्या बाबतीत सुरू आहे. आणीबाणीसारखी परिस्थिती कोण निर्माण करीत आहेत व अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान दिसत आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. न्यायालयीन डावपेचातून शहा सुटले आहेत. तेव्हा मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला, त्याचे फळ त्यांना मिळाले. वाचा: