'देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 16, 2020

'देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग'

https://ift.tt/2WjItGB
नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा २१ वा दिवस आहे. या दरम्यान, कृषी कायद्याच्या विरोधात एनडीएमधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारलेल्या शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष यांनी भाजपवर जहरी टीका केलीय. आपल्या माजी सहकारी असलेल्या भाजपला त्यांनी 'खरीखुरी ' म्हटलंय. पंजाबमध्ये हिंदुंना शिखांविरुद्ध करण्याचा आरोप सुखबीर सिंह बादल यांनी केलाय. 'देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग आहे. त्यांनी देशाच्या एकतेला तुकड्यांत विभाजन केलंय. ते निर्लज्जपणे हिंदुंना मुस्लिमांविरोधात भडकावत आहेत आणि आता नैराश्यग्रस्त अवस्थेत शांतिप्रिय पंजाबी हिंदुंना त्यांच्या शिख बंधुंच्या खासकरून शेतकऱ्यांच्या विरोधात उभं करू पाहत आहेत. ते देशभक्त पंजाबला जाती-धर्माच्या आगीकडे ढकलत आहेत', असं ट्विट सुखबीर सिंह बादल यांनी केलंय. वाचा : वाचा : भाजपनं कृषी कायद्यांवर 'अहंकार वृत्ती' सोडून शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असंही सुखबीर सिंह बादल यांनी म्हटलंय. हिंदुंना शिखांविरुद्ध भडकावण्यापासूनं बंद करा, असा इशाराही त्यांनी दिलाय. जर कोणी केंद्र सरकारच्या बाजूनं बोलत असेल तर त्याला 'देशभक्त' म्हटलं जातं, मात्र त्यांच्याविरूद्ध बोलल्यास त्याला 'तुकडे तुकडे गँग' म्हटलं जातं, असंही एनडीएसोबत केंद्रात काम केलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या प्रमुखांनी म्हटलंय. संसदेत विरोधकांचा विरोध डावलत केंद्रात सत्ताधाऱ्यांनी कृषी विधेयके संमत करून घेतले होते. यानंतर, अकाली दलाच्या नेत्या आणि सुखबीर सिंह बादल यांची पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सोबतच, राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी विनंतीही त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. मात्र, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं. वाचा : वाचा :