सराव सामन्यात अजिंक्य रहणेचे खणखणीत शतक, पृथ्वी आणि गिल शून्यावर बाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 6, 2020

सराव सामन्यात अजिंक्य रहणेचे खणखणीत शतक, पृथ्वी आणि गिल शून्यावर बाद

https://ift.tt/36Nr0MR
नवी दिल्ली: भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात सुरू असलेल्या सराव लढतीत भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने जो सध्या या लढतीत कर्णधाराच्या भूमिकेत आहे त्याने शानदार शतकी खेळी केली. राहणे वगळता चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ हे दोघेही शून्यावर बाद झाले. त्यानंतर हनुमा विहारी देखील १५ धावा करून माघारी परतला. भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. तेव्हा पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांचा अनुभव दाखवला. त्यांनी ७६ धावांची भागिदारी केली, पुजारा ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला वृद्धीमान साहाला भोपळा फोडता आला नाही. तर आर अश्विन देखील पाच धावा करून बाद झाला. वाचा- कुलदीप यादव १५ धावा करून माघारी परतला. दरम्यान अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. त्याने १६ चौकार आणि एक षटकार मारला. त्याला चांगली साथ देणारा उमेश यादव २४ धावा करून माघारी परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने ९० षटकात ८ बाद २३७ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे १०८ धावांवर तर मोहम्मद सिराज शून्यावर नाबाद होता. पृथ्वी शॉने दिले टेन्शन नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात पृथ्वी शॉची कामगिरी खराब झाली होती. आता सराव सामन्यात देखील तो अपयशी ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. एडिलेट येथे होणारी पहिली कसोटी डे-नाइट असेल. रोहित शर्मा या लढतीत खेळू शकणार नाही त्यामुळे मयांक अग्रवाल सोबत पृथ्वी शॉ भारतीय डावाची सुरूवात करेल अशी चर्चा होती. पण आता पृथ्वी अपयशी ठरल्याने भारतीय संघ व्यवस्थापन टेन्शनमध्ये आले आहे. पृथ्वीने आतापर्यंत चार कसोटी सामन्यात ५६च्या सरासरीने धावा केल्या आहेत.