शेतकऱ्यांचा पहिला भारत बंद; बाबा आढाव म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 10, 2020

शेतकऱ्यांचा पहिला भारत बंद; बाबा आढाव म्हणाले...

https://ift.tt/3gEysNK
म . टा. प्रतिनिधी, पुणे कामगारांनी किंवा राजकीय पक्षांनी विविध मुद्द्यांवर आतापर्यंत अनेकदा आंदोलन केले असले, तरी शेतकऱ्यांनी केलेला पहिला '''' असे मंगळवारच्या आंदोलनाचे वर्णन करता येईल. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेकदा आंदोलने केली; पण मंगळवारचे आंदोलन शेतकऱ्यांनी आणि समाजाने शेतकऱ्यांसाठी केलेले पहिलेच राष्ट्रीय आंदोलन ठरले आहे, अशी भावना कामगार नेते यांनी व्यक्त केली. शहरी समाज पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला. स्वातंत्र्यापासून अनेकदा भारत बंदसारखी आंदोलने झाली; पण शेतकऱ्यांनी केलेले हे पहिलेच भारत बंद आंदोलन आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांनी सतत आंदोलने केली; पण ती प्रादेशिक ठरली. कोणत्याही राजकीय नेतृत्वाबिगर शेतकऱ्यांनी उभा केलेला हा पहिलाच लढा आहे. 'शेतकऱ्यांनी केलेले 'भारत बंद' आंदोलन मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले,' असे वर्णन डॉ. आढाव यांनी 'मटा'शी बोलताना केले. ''संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी शेतकरी आणि शहरी समाज रस्त्यावर होता; पण तेव्हा प्रश्न भाषेचा आणि राज्याचा होता. शेतकऱ्यांची अनेक आंदोलन झाली. त्यामध्ये आम्हीही सहभागी झालो; पण भारत बंद आंदोलन पहिल्यांदाच पाहिले. शहरी माणसं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येण्याची ही पहिली घटना आहे. शहरी माणसं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि समाधान वाटले,'' अशी भावना बाबांनी व्यक्त केली. 'आतापर्यंत कामगारांनी किंवा राजकीय पक्षांनी भारत बंद केला आहे; पण शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच भारत बंद केला,'' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी दिली. ' आम्ही अनेक आंदोलने केली; पण शहरातून समर्थन मिळायचे नाही. बळाचा वापर व्हायचा. या आंदोलनावेळी कुठेही जबरदस्ती न होता लोकांनी अन्नदात्यासाठी एक दिवस उत्स्फूर्तपणे दिला. पोलिसांकडे एकही तक्रार नोंद झाली नाही. शेतकऱ्यांच्या मागे समाज उभा आहे, असा संदेश राज्यकर्त्यांपर्यंत गेला. राष्ट्रीय आंदोलनासाठी शरद जोशींनी अनेकदा प्रयत्न केले. शेतकरी आंदोलनाला ऊस, कापूस या पिकाप्रमाणे प्रादेशिक स्वरूप होते. शेतकरी चळवळ संपली असे म्हणणाऱ्यांना शेतकऱ्यांनी राजकीय नेतृत्वाशिवाय एकजूट दाखवली,'' असे वर्णन शेट्टी यांनी केले. बळीराजाचा बळी कुठलेही धोरण राबवताना शेवटच्या पायरीवरील माणसाचा प्राधान्याने विचार व्हावा, असे सूत्र महात्मा गांधींनी घालून दिले आहे. थंडी आणि करोनाची पर्वा न करता शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकले आहेत. करोनाच्या गंभीर वातावरणात शेतकरी जिवावर उदार का झाला आहे, याचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. - , साहित्य संमेलनाध्यक्ष