भारताविरोधात कुटील कारस्थान; चीनने आखला 'हा' डाव ! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 25, 2021

भारताविरोधात कुटील कारस्थान; चीनने आखला 'हा' डाव !

https://ift.tt/3oewB4c
बीजिंग: मागील वर्षभरापासून आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनने भारताविरोधात आणखी एक कुटील कारस्थान आखला असल्याची चर्चा आहे. चीनने तिबेटहून भारतात येणाऱ्या नद्यांवर मोठी धरणे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. ग्लोबल वार्मिंगचे आवाहन समोर असताना चीनने आता भारतात दुष्काळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय पावसाळ्यात धरणातून पाणी सोडून भारतात पूरही आणू शकतो. 'आशिया टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडून यारलुंग जांगबो (ब्रह्मपुत्र नदी) एक महाकाय धरण बांधत आहे. या धरणातून जगातील सर्वात धरण असलेल्या थ्री जॉर्जच्या तुलनेत तीन पटीने अधिक जलविद्युत निर्मिती होणार आहे. चीनच्या या महाकाय धरणामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमध्ये दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रह्मपुत्र नदीवर धरण बांधण्याच्या मुद्यावरून चीनने भारत आणि बांगलादेशसोबत कोणतीही चर्चा केली नाही. पाणी वाटपावरून झालेल्या करारावरकडे चीन दुर्लक्ष करत आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण-पूर्व आशियात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाचा: चीनने अशाच प्रकारे मेकांग नदीवरही ११ च्या आसपास मोठी धरणे उभी केली आहेत. या कारणांमुळे म्यानंमार, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम पूर्वमधील नदीच्या प्रवाहात व्यापक प्रमाणावर चढ-उतार दिसून येतो. चीनची मेकांग नदी ही युनान प्रांतातून सुरू होऊन म्यानमार, थायलंड, लाओस आणि कंबोडिया आदी देशांमध्ये जाते. लांबीच्या दृष्टीने मेकांग ही जगातील १० वी सर्वात मोठी नदी आहे. वाचा: मेकांग नदी ही पूर्व आशियाई भागातील ६० दशलक्ष लोकांसाठी जीवनवाहिनी आहे. कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाममदील माध्यमांमध्ये दुष्काळाबाबत अनेक वृत्त प्रसारीत केले आहेत. यामध्ये दुष्काळासाठी चीनलाच दोषी ठरवण्यात आले आहे. चीन आपल्या जलविद्युत प्रकल्पासाठी आणि सिंचनासाठी मेकांग नदीवर ४७ अब्ज क्युबिक मीटर पाण्याचा वापर करत आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांच्याबाबतीत चीनची भारतावर रणनितीक आघाडी आहे. लोवी इन्स्टिट्यूटने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने तिबेटच्या पाण्यावर दावा ठोकला आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये वाहणाऱ्या सात नद्या, सिंधू, गंगा, ब्रह्मापुत्र, इरावडी, सलवीन, यांगट्जी आणि मेकांगच्या पाण्याला नियंत्रित करत आहे. या नद्या पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाममधून वाहतात. त्यातील ४८ टक्के पाणी भारतातून वाहते.