नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत तणावाची स्थिती असताना इस्रायली दुतावासाजवळ स्फोट झाला. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालचा दौरा रद्द करावा लागला. अशा परिस्थितीत उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींची ( ) यावेळची 'मन की बात' ( ) महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी काय सांगणार?... वाचा अपडेट.... - तरुणांनी देशातील स्वातंत्र्यसैनिकांविषयी जाणून घ्यावं आमि आपल्या क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याच्या वीर गाथांबद्दल पुस्तक लिहावं - रस्ते सुरक्षेसाठी भारत सरकारसह वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपण सर्वांनी प्राण वाचवण्यासाठी या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे भाग घ्यावा - शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न सुरूच राहतील - करोना संकटात रोजगार गेल्यानंतर मध्य प्रदेशातील महिलांनी स्वतःची राईस मिल सुरू केली. बुंदेलखंडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होतेय. झांसीतील स्ट्रॅबेरी फेस्टिव्हल आयोजित केला जातोय. यामाेगही तरुण महिला आहेत. - २६ जानेवारीच्या संचलनात भारतीय हवाई दलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी नवा इतिहास रचला प्रजास्ताक दिनाला महिला पायलट्सनी भारताची शान वाढवली. अशा प्रकारचे कौतुक गावातील महिलांचेही व्हायला हवे - अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को ते बेंगळुरू अशी थेट फ्लाइट ४ महिला पायलट्सनी यशस्वीरित्या करून दाखवली. हा प्रवास १० हजार किलोमीटरचा होता. कुठेही न थांबतना त्यांनी तो पूर्ण केला. या विमानात २२५ हून अधिक प्रवासी होते. - क्षेत्र कुठलंही असो देशाच्या विकासात महिलांची भागिदारी वाढली आहे. - करोनावरील स्वदेशी लसींमुळे आत्मविश्वास वाढला आहे. जगभरातून भारताचं मोठं कौतुक होतंय - जगात सर्वात वेगात भारताने १५ दिवसांत ३० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली - २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाच्या झालेल्या अपमानाने देश दुःख झाला - पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दल नक्की जाणून घ्या, कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करता. सर्वांना त्यातून प्रेरणा मिळालेल - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी झाली. ऑस्ट्रेलिया भारतीय संघाने मिळवलेला विजय कौतुकास्पद - मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू झालं