
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलना दरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या दरम्यान संसदेत बोलताना 'जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवलं जातं' अशी टीका शिवसेना खासदार यांनी भाजप सरकारवर केलीय. गेल्या सहा वर्षांपासून खरं ऐकतोय आणि खोट्यालाही खरं मानतोय, असं पहिलंच वाक्य उच्चारत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ', शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा' जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जातं. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं संजय राऊत यांनी सदनात म्हटलं. 'देशाच्या प्रतिष्ठेसाठी हे चांगलं नाही' बहुमत चंचल असतं, अहंकारानं सत्ता चालविली जाऊ शकत नाही. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असं संत तुकारामांनी म्हटलंय... पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आज शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. ही गोष्ट देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट नाही, असा सल्लाही संजय राऊत यांनी सरकारला दिलाय. 'कुणी केला तिरंग्याचा अपमान?' लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला... पण हा अपमान कुणी केला? त्याला मात्र तुम्ही पकडू शकलेला नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला. 'गोस्वामी, रानौत देशप्रेमी आहेत?' प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आहेत मात्र देशप्रेमी कोण आहे तर अर्नब गोस्वामी, कंगना राणौत? हे देशप्रेमी आहेत का? असा प्रश्न विचारत यांना सरकारनं शरण दिल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. शेतकरी आंदोलनाबद्दल व्यक्त केली कळकळ शेतकरी आंदोलनाची एकजुटता तोडण्यात सरकारला अपयश आलं. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि या एकजुटतेमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो. पंजाब, हरयाणाचा शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय... ही केवळ तीन राज्यांची लढाई नाही... संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल कळकळ व्यक्त केली. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यासहीत शिवसेना खासदारांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. गुरुवारी संसदेत शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेचं कामकाज आज सकाळी ९.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी राज्यसभेत १५ तासांचा वेळ दिला गेला आहे. यासाठी गुरुवारी १० विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक बैठकही घेतली.