उत्तराखंड दुर्घटना LIVE : पहाटेपासून पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 8, 2021

उत्तराखंड दुर्घटना LIVE : पहाटेपासून पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात

https://ift.tt/3rtX284
जोशीमठ, : उत्तराखंडमधील जिल्ह्यात जोशीमठजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटल्यानं हिमस्खलन होऊन अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या हिमालयीन पर्वतरांगांच्या भागात हाहाकार उडाला. महापुराच्या तडाख्यात विद्युत प्रकल्प वाहून गेले आणि १२५ मजूर गाडले जाऊन मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागातून आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागले आहेत. या संकटामुळे राज्यात सन २०१३ मध्ये झालेल्या भीषण ढगफुटीच्या स्मृती ताज्या झाल्या. वाचा : LIVE घडामोडी : - सुरुंगात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आत्तापर्यंत १६ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. तर १४ मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून हाती लागले आहेत. - चमलीच्या तपोवन धरणाजवळ सुरुंगात एसडीआरएफकडून बचाव मोहीम राबवण्यात येतेय. - अंधारामुळे रात्री थोड्यावेळ थांबल्यानंतर सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा आयटीबीपी, भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या कामाला सुरुवात झालीय. रविवारी काय घडलं नेमकं? डेहराडूनपासून २९५ किलोमीटरवर असलेल्या जोशीमठजवळ झालेल्या या हिमस्खलनानंतर गंगा नदीच्या उपनद्या असलेल्या धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा नद्यांना अचानक पूर आल्यानं उत्तराखंडच्या डोंगराळ भागाला तडाखा बसला आणि भीतीचे वातावरण पसरलं. एनटीपीसीचा तपोवन-विष्णुगड वीजप्रकल्प आणि ऋषीगंगा वीज प्रकल्पांची यात वाताहत झाली आणि इथं काम करत असलेले अनेक मजूर अडकले. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या सोळा मजुरांची बचाव पथकांनी सुटका केली. मात्र, १२५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. हिमस्खलनामुळे आलेल्या पुरामुळे नदीकिनारी असलेली घरंही वाहून गेली आहेत. नदीच्या खालच्या बाजूला असलेल्या दाटीवाटीच्या लोकवस्तीच्या गावांनाही महापुराचा तडाखा बसल्याची भीती असून अनेक गावांतील नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रेनी गावाजवळील पूल वाहून गेल्यामुळे सीमेवरील काही ठाण्यांशी संपर्क पूर्णपणे तुटल्याचं 'इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस'च्या (आयटीबीपी) प्रवक्त्यांनी सांगितलं. मात्र, संध्याकाळनंतर नदीच्या त्यापुढील प्रवाहाचा भाग सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. जलविद्युत प्रकल्प वाहून गेला उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं रविवारी हिमनदी कोसळल्यामुळे तेथील बांधकामांतर्गत असलेला जलविद्युत प्रकल्प वाहून गेला आहे नॅशनल ग्रीडमधील २०० मेगावॉट विजेच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हिमनदी कोसळल्यानं उत्तराखंड इथले तेहरी आणि कोटेश्वर हे दोन विद्युत प्रकल्प खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत. उमा भारतींची प्रतिक्रिया उत्तराखंडामध्ये झालेल्या नैसर्गिक दुर्घटना ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच मंत्री म्हणून गंगेवर वीजप्रकल्प उभारण्यास माझा विरोध आहे, असे केंद्रीय नदीविकास मंत्री उमा भारती यांनी म्हटलंय. कुंभमेळ्यासाठी मागणी नाही दुसरीकडे, हरिद्वार इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उत्तराखंड सरकारकडे कोणतीही मागणी न करण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेनं घेतलाय. रविवारी उत्तराखंडमध्ये हिमखंड तुटल्याने चमोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.