केंद्राच्या निर्णयाचे शरद पवारांकडून स्वागत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 13, 2021

केंद्राच्या निर्णयाचे शरद पवारांकडून स्वागत

https://ift.tt/2PYhFfg
म. टा. प्रतिनिधी, मुंबई १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पद्धतीने स्वातंत्र्यदिनाची ७५ वर्षे साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. यांनी शुक्रवारी स्वागत केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संबंधित सर्व कार्यक्रमांचे भारताच्या सर्व राज्यांत आणि संघराज्याच्या क्षेत्रामध्येसुद्धा आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाची मान उंचावणाऱ्या या महोत्सवाचा हिस्सा होण्याचा गौरव वाटत आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व आणि हुतात्म्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, केंद्र सरकारच्या या अभियानाला शरद पवार यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.