म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारने सरसकट लॉकडाउनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते यांनी केली आहे. लॉकडाउनपेक्षा राज्य सरकारने मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी नियोजन करायला हवे, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात किंवा निर्बंध घातले जात असून त्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी ट्वीट केले आहे. राज्य सरकारने सरसकट लॉकडाउनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा. तसेच बाकी अनेक राज्यांत जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावे. आधीच आर्थिकदृष्ट्या त्रस्त जनतेला लॉकडाउन करून अडचणीत आणू नये, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.