अहमदाबाद : गुजरातला असल्याचं सांगत उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान पिळल्यानंतर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारकडून फैलावल्यानं धोकादायक बनलेल्या राज्यातील २० महत्त्वाच्या शहरांत लावण्याची घोषणा केलीय. सोबतच, लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची संख्याही सीमित केलीय. ही माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिलीय. गुजरातमध्ये आजपासून (बुधवार) २० शहरांत रात्री ८.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय. लग्न समारंभात १०० जण सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलीय. ग्रॅन्ड इव्हेन्टसला ३० एप्रिलपर्यंत टाळण्यात आलंय. सरकारी कार्यालयही ३० एप्रिलपर्यंत शनिवारच्या दिवशी बंद राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत. राज्यात संक्रमणाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहेत. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तीन - चार दिवसांसाठी कर्फ्यू, नाईट कर्फ्यू अन्यथा लॉकडाऊन करण्याचा सल्ला उच्च न्यायालयानं एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून २० शहरांत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय. करोना संक्रमणाच्या स्थितीवर स्वत:हून हस्तक्षेप करत मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती भार्गव करिया यांच्या खंडपीठानं एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला हा सल्ला दिला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये एव्हाना ३ लाख २४ हजार ८७८ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय. यातील १७ हजार ३४८ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत तर ४ हजार ५९८ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.