स्वच्छ पाणी, वीज पुरवठ्यासाठी आंदोलन; पोलिसांच्या गोळीबारात तीन ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 9, 2021

स्वच्छ पाणी, वीज पुरवठ्यासाठी आंदोलन; पोलिसांच्या गोळीबारात तीन ठार

https://ift.tt/2Tg3BPC
काबूल: तालिबानी राजवटीपासून जवळपास दोन दशके आधी मुक्तता मिळवणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये अद्यापही मूलभूत पायाभूत प्रश्न कायम आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये स्वच्छ पाणी आणि वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. मंगळवारी ही घटना घडली. या गोळीबारामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, या घटनेवर प्रांतीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे. तर, पोलिसांनी गोळीबार केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. स्थानिक वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या फैजाबाद शहरात बदख्शान प्रांताच्या राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर स्वच्छ पाणी व इतर मागण्यांसाठी जवळपास २०० जण निदर्शने करत होती. आंदोलनकर्ते सीबगतुल्लाह अंदेशमंद यांनी सांगितले की, राज्यपालांनी किमान आमच्या मागण्यांवर चर्चा करावी, संवाद साधावा अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या कार्यालयात तैनात असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. प्रांतीय रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक शफीकुल्लाह हमदर्द यांनी सांगितले की, गोळीबाराच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, ४२ जण जखमी झाले आहेत. राज्यपालांच्या कार्यालयाने याबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रांतीय पोलीस विभागाचे प्रवक्ते सनाउल्लाह यांनी सांगितले की, हा गोळीबार राज्यपालांच्या सुरक्षा जवानांकडून अथवा पोलिसांकडून करण्यात आला नाही. वाचा: तालिबाननेही या गोळीबाराच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानकडून या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ प्रत्युत्तर दिले गेल्यास परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.