सोनिया गांधींनी जाहीर केली 'टीम पटोले'; प्रज्ञा सातव प्रदेश उपाध्यक्ष तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 27, 2021

सोनिया गांधींनी जाहीर केली 'टीम पटोले'; प्रज्ञा सातव प्रदेश उपाध्यक्ष तर...

https://ift.tt/3DkhFKK
मुंबई: हायकमांडने राज्यात पक्षाची धुरा यांच्याकडे सोपवल्यानंतर आता पटोले यांची 'जम्बो टीम' जाहीर करण्यात आली आहे. राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने ठरवले असून त्याला अनुसरून राज्य कार्यकारिणीत अनुभवी चेहऱ्यांसोबतच तरुण तडफदार नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. करोनाच्या विळख्यात सापडून देहावसन झालेले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या पत्नी यांची कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. पटोले यांच्या टीममध्ये १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. ( ) वाचा: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांनी आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर सहा महिन्यांनी नव्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या कार्यकारिणीत राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळत आहे. वाचा: क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत उघडपणे आव्हान देणारे आशिष देशमुख यांची राज्य सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे तर दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार धीरज देशमुख यांनाही सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. सरचिटणीसांच्या यादीत गांधी घराण्याचे जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र शैलेश शिवराज पाटील चाकूरकर यांनाही स्थान देण्यात आलं आहे. अमरजीजसिंह मनहास यांच्याकडे राज्य कोषाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली असून आता राज्यात काँग्रेसचे सहा प्रवक्ते असणार आहेत. त्यात अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, राजू वाघमारे, सचिन सावंत, संजय पाटील आणि उत्कर्ष रुपवते यांचा समावेश आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीत उल्हास पवार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन, हर्षवर्धन सपकाळ हे सदस्य असणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीसोबत १४ जिल्हाध्यक्षही जाहीर करण्यात आले आहेत. त्यात ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर, उल्हासनगर शहर, सोलापूर ग्रामीण, सांगली ग्रामीण, जळगाव शहर, पुणे शहर जिल्ह्यासाठी नवे अध्यक्ष मिळाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी काँग्रेसचं हे सर्वात मोठं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. वाचा: