विजयाचा जल्लोष केल्यानंतर भारताचा झाला पराभव; अशी झाली अफलातून मॅच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

विजयाचा जल्लोष केल्यानंतर भारताचा झाला पराभव; अशी झाली अफलातून मॅच

https://ift.tt/3o7jkye
मकाय: भारताचा महिला संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात काल शुक्रवारी दुसरी वनडे झाली. या लढतीत ऑस्ट्रेलियाने थरारक असा विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजयाचा खास ऑस्ट्रेलियाच्या तोंडात दिला. वाचा- दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकात ७ बाद २७४ धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधनने सर्वाधिक ८६ धावा केल्या. विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करता आली नाही. २५ षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात खेळत होता. पण त्यानंतर बेथ मूनीने धमाकेदार फलंदाजी केली. मूनीने १३३ चेंडूत नाबाद १२५ धावा केल्या आणि संघाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला. वाचा- विजयाचा खास ऑस्ट्रेलियाला दिला अखेरच्या ३ षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३३ धावांची गरज होती. ४८व्या षटकात पुनम यादवने १० धावा दिल्या. त्यानंतर ४९व्या षटकात राजश्वरी गायकवाडने देखील १० धावा दिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. भारताकडून अखेरचे षटक झुलन गोस्वामीने या सर्वात अनुभवी गोलंदाजाने टाकले. वाचा- पहिला चेंडू- ३ धावा दुसरा चेंडू- २ धावा आता ऑस्ट्रेलियाला ४ चेंडूत ८ धावांची गरज होती तिसरा चेंडू- नो बॉल तिसरा चेंडू- फी हिटवर एकच धाव घेतली चौथा चेंडू- १ धाव पाचवा चेंडू- २ धाव ऑस्ट्रेलियाला अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती सहावा चेंडू- झुलनने फुलटॉस टाकला, मूनीने मारलेला चेंडू झुलनने कॅच घेतला आणि भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करण्यास सुरूवात केली. पण तिसऱ्या अंपायरनी चेंडू कंबरेच्या वर असल्याने तो नो बॉल दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आणखी एक चेंडू मिळाला. आता विजयासाठी १ चेंडूत दोन धावांची गरज होती. एक धाव घेतली तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार होता. मूनीने यावेळी चूक केली नाही अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेत शानदार विजय साकारला. ऑस्ट्रेलियाकडून मूनी आणि निकोल कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ९७ धावांची भागिदारी केली. भारताने अखेरच्या ३ षटकात अतिशय खराब गोलंदाजी केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सलग २६वा विजय ठरला आहे. तर भारताविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.