अश्विनलाच का देण्यात आले अखेरचे षटक, पाहा दिल्लीच्या संघात मोक्याच्या क्षणी असं घडलं तरी काय होतं... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 14, 2021

अश्विनलाच का देण्यात आले अखेरचे षटक, पाहा दिल्लीच्या संघात मोक्याच्या क्षणी असं घडलं तरी काय होतं...

https://ift.tt/3v7GUfz
शारजा : दिल्ली कॅपिटल्सवर वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत असतानाही अखेरचे षटक फिरकीपटू अश्विनला देण्याची पाळी आल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीच्या संघाला सामना खेळत असतानाच मोठा धक्का बसला होता आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीच्या संघात नेमकं घडलं तरी काय, पाहा...दिल्लीच्या संघाकडून हा सामना कोलकाताच्या सलामीवीरांनी खेचून आणला होता. पण केकेआरचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी केकेआरची मधली फळी चिरून काढली आणि त्यामुळेच त्यांची विजयाची आशा निर्माण झाली होती. त्यामुळे अखेरच्या षटकातही वेगवान गोलंदाजाच्या हाती चेंडू असला असता तर दिल्लीला विजय मिळू शकला असता. पण दिल्लीकडे तसा पर्याय उपलब्ध असतानाही तो वापरता आला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात मार्कस स्टॉइनिसला संधी दिली होती. मार्कस गोलंदाजीही करत असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले होते. पण या सामन्यात मार्कसला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला एकही षटक टाकता आले नाही. दुसरीकडे केकेआरच्या संघावर दबाव वाढवण्यासाठी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने एकामागून एक वेगवान गोलंदाजांना षटके दिल्याचे पाहायला मिळाले, त्यावेळी ती खेळाची गरजही होती. पण अखेरच्या षटकात मात्र अश्विनकडे चेंड सुपूर्द करण्यावाचून पंतकडे पर्याय नव्हता. पण अश्विननेही यावेळी संघाला निराश केले नाही. अखेरच्या षटकात अश्विनने दोन विकेट्स मिळवत दिल्लीसाठी दमदार कामगिरी केली. पण अश्विनच्या षटकातील फक्त तो एकच चेंडू चुकीचा पडला आणि दिल्लीच्या संघाला त्याचाच मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. जर अश्विनने अखेरचे दोन चेंडू निर्धाव टाकले असते तर दिल्लीच्या संघाला विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचता आले असते. पण तसे घले मात्र नाही. कोलकाताच्या संघाने यावेळी विजय साकारला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अंतिम फेरीत केकेआरचा सामना आता चेन्नई सुपर किंग्सबरोबर होणार आहे.