२५ लाख हॉटेल कर्मचारी बेरोजगार; हॉटेलची वेळ वाढवण्याची मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

२५ लाख हॉटेल कर्मचारी बेरोजगार; हॉटेलची वेळ वाढवण्याची मागणी

https://ift.tt/3vsDy6V
म. टा. प्रतिनिधी, व रेस्तरां रात्री १२पर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. पण करोनासंकटात मागील दीड वर्षात या क्षेत्रातील २५ लाख कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे. त्यात मुंबईतील ४० टक्के नोकऱ्यांचा समावेश आहे. आता उर्वरित नोकऱ्या वाचविण्यासाठी हॉटेल रात्री दीडपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. करोनासंकटाचा मोठा फटका हॉटेल व रेस्तरां उद्योगाला बसला. एकीकडे दीड वर्षात पर्यटन बंद झाले असताना सरकारकडून आतापर्यंत निर्बंध होते. त्यामुळे ग्राहकसंख्या मर्यादित झाली आहे. त्या स्थितीत रात्री १२ पर्यंत रेस्तरांना परवानगी देण्याच्या निर्णयाचे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे (हारवी) अध्यक्ष शेरी भाटिया यांनी स्वागत केले. पण ही शिथिलता पुरेशी नसल्याचे त्यांचे मत आहे. 'व्यवसाय बंद असतानादेखील बहुतेक रेस्टॉरामालकांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले. त्यासोबतच प्रशासनाचा कर आणि अन्य सर्व शुल्कदेखील भरावे लागल्याने हा व्यवसाय भीषण तोट्यात सुरू आहे. हॉटेल्स व रेस्तरां यांचा सर्वाधिक व्यवसाय रात्री १०नंतरच होतो. त्यामुळेच सध्या या क्षेत्रावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असलेले राज्यातील सुमारे ५० लाख रोजगार वाचविण्यासाठी दीडपर्यंतची वेळ दिली जावी', अशी मागणी भाटिया यांनी केली. 'दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाआधी रेस्टॉरंट्सची वेळ वाढविण्याचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. याची नितांत गरज होती. रेस्टॉरंटच्या वेळेत वाढ केल्याने सणांचा उत्साह द्वीगुणित होणार आहे. रेस्टॉरंट उद्योगाला सर्वाधिक गरज असताना वैद्यकीय कर्मचारी, शासन यंत्रणा आणि राज्य सरकारने ज्याप्रकारे करोना नियंत्रणात आणला आहे, त्याबद्दल आम्ही या सर्व घटकांचे अभिनंदन करतो', असे मत 'आहार' या संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केले. ४० टक्के हॉटेल बंद मुंबई शहर व उपनगरांत जवळपास ७५ हजार लहान-मोठे रेस्तरां आहेत. यापैकी ४० टक्के अर्थात सुमारे ३० हजार रेस्तरां, धाबे मागील लॉकडाउन व आताच्या निर्बंधांत बंद पडले. यांमधील किमान तीन लाख कर्मचारी, वेटर बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर उर्वरित हॉटेल व रेस्तरां हिमतीने उभे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांना वेळ वाढवून मिळण्याची नितांत गरज होती. ती आता मिळाली असली तरी व्यवसायाची घडी पुन्हा बसवण्यासाठी वेळेची आणखी मुभा हवी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.