
मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा हा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. हे प्रकरण हाताळत असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वानखेडे यांनी त्यांच्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याची तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेत त्यांची सुरक्षा वाढवली आहे. ( ) वाचा: समीर वानखेडे यांच्या सुरक्षेसाठी असलेले अंगरक्षक आणि सशस्त्र पोलीस यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचं शासकीय वाहनही बदलण्यात आलं आहे. याशिवाय एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे वानखेडे हे सध्या प्रकाशझोतात आहेत. वानखेडे यांच्या निर्देशानुसारच टीमने क्रूझवर छापा टाकला होता व तिथून ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात आर्यन खान याच्यासह २० जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात तपास सुरू असतानाच वानखेडे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळेच त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. वाचा: समीर वानखेडे यांच्यावर पाळत? समीर वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. निधनानंतर नियमितपणे वानखेडे हे या स्मशानभूमीत जातात व आईचे स्मरण करतात. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्मशानभूमीत गेले असता कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवत तक्रार केली आहे. पाळत ठेवणाऱ्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील दोन अधिकारी असल्याचाही त्यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांचीही भेट घेऊन स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. दरम्यान, गृहमंत्री यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. अशी पाळत ठेवण्याबाबत पोलिसांना वा राज्य गुप्तचर विभागाला कोणतेही आदेश सरकारने दिलेले नाहीत, असे वळसे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त याप्रकरणी चौकशी करणार असून सात दिवसांत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणात ज्यांच्यावर वानखेडे यांचा संशय आहे त्यांची चौकशी होणार असून वानखेडे यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यासाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. वाचा: