
अहमदनगर : ‘एक आमदार किती काम करू शकतो? काय काम करू शकतो, हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी दाखवून दिले आहे. शरद पवारांचा नातू अशी ओळख असली तरीदेखील कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेसाठी रोहित पवार मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत, याचे आम्ही साक्षीदार आहोत,’ अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांनी आमदार पवार यांचे कौतुक केले. ( Dhananjay Munde Latest News ) वाचा : सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे कर्जतला आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आमदार रोहित पवार हे यांचे नातू आहेत. राज्यातील दहा ते पंधरा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देखील ते घेऊ शकतात. मात्र, तसे न करता ज्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या मधील जनतेसाठी हा पवार यांचा नातू मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात उंबरे झिजवत आहे आणि अशा पद्धतीचे नेतृत्व लाभणे हे खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट आहे.’ वाचा : मुंडे यांनी यावेळी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, ‘केंद्रातील अशी एकही यंत्रणा राहिली नाही की जिचा वापर करून या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही. खोटे आरोप केले, मंत्र्यांना तुरुंगात डांबले. मात्र, यश येत नाही म्हणून आता धार्मिक वाद उभा करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेने दोन वेळा यांना निवडून दिले. राज्यात मंत्री झाले, परंतु त्यांना जे जमले नाही ते रोहित पवार यांनी करून दाखविले.’ यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, ‘आज मतदारसंघातील पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रं वाटप होत आहे. आगामी काळामध्ये आणखी दहा हजार लोकांना याचा लाभ दिला जाणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाची प्रत्येक योजना घेऊन जाणार आहे.’ वाचा :