साहित्य संमेलन समारोप: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साहित्याबाबत मोठे विधान, म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 25, 2022

साहित्य संमेलन समारोप: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साहित्याबाबत मोठे विधान, म्हणाले...

https://ift.tt/9QH30W1
भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा आपली मोठी शक्ती आहे. लेखनातून देशाच्या भविष्याची नीती आखावी लागणार आहे. समाजानुकूल, राष्ट्रानुकूल साहित्य देशाला विकासाच्या दिशेने नेईल. त्यासाठी शिक्षण आणि साहित्याच्या व्यासपीठावर होऊ नये, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री यांनी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात केले. (marathi union minister has said that should be free from ) उदगीर येथे आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी समारोप झाला. या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मीना सासणे, कांचन गडकरी, शिल्पा बनसोडे, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, पालकमंत्री अमित देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड, रामचंद्र तिरुखे, दिनेश सास्तूरकर उपस्थित होते. गडकरी यांनी आपल्या भाषणात साहित्याकडून देशाच्या असलेल्या अपेक्षा सांगितल्या. क्लिक करा आणि वाचा- ‘साहित्य आणि साहित्यिक जीवन घडवतात. हा विचार डोळ्यांच्या मागे असतो. हा विचार कोणतीही सत्ता नष्ट करू शकत नाही. जीवनाचे विचार साहित्यातून मिळतात आणि परिवर्तनाची दिशा सापडते. मराठी नाटक, संगीत, साहित्य वेगळे आहे. फक्त बंगाली संस्कृतीशीच त्याची तुलना होऊ शकेल. महाराष्ट्राबाहेर असताना त्याची प्रकर्षाने जाणीव होते. लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिण्याचा अधिकार असला तरी समाजाला दिशा देणाऱ्या साहित्याची गरज आहे. म्हणून साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण होता कामा नये. त्यात राजकीय रंगाचे मिश्रण करण्याची गरज नाही. मतभेद असणे जिवंतपणाचे लक्षण आहे. मतभेद असावे, मनभेद नसावे. त्यासाठी विरोधी विचारांचाही सन्मान करावा’, असे गडकरी म्हणाले. दरम्यान, गडकरी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. अमित देशमुख यांनीही सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याचा मुद्दा मांडला. रामचंद्र तिरुके यांनी सीमावर्ती भागातील ८६२ मराठी गावं लवकर महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी प्रास्ताविकात केली. क्लिक करा आणि वाचा- बदनामीकारक लेखनाचा निषेध संमेलनाच्या समारोपात साहित्य महामंडळाने २० ठराव मांडले. त्यात ‘शिवाजी – हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या ब्रिटीश लेखक जेम्स लेन याच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाचे सूचक डॉ. रामचंद्र काळुंखे आणि अनुमोदक विलास मानेकर आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणाऱ्या किंवा सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध करणारा ठरावही मांडण्यात आला. या ठरावाचे सूचक डॉ. विद्या देवधर आणि अनुमोदक पुरुषोत्तम सप्रे आहेत. क्लिक करा आणि वाचा-