राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी राज्यमंत्री कदम यांची मोठी घोषणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 23, 2022

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी राज्यमंत्री कदम यांची मोठी घोषणा

https://ift.tt/yMLia1S
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवू, हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत विविध उपक्रमांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. (the department of social justice will provide rs 8 crore for the samadhi of ) हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी १५ लाखांचा निधी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला, यावेळी ते बोलत होते. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारी निर्णय घेऊन हेरवाड आणि माणगावने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला सामाजिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येकी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू मिलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून शाहू मिल विकास आराखडा मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भावनिक साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. या त्यांच्या कार्यामुळे हा जिल्हा संपन्न असण्याबरोबरच कोल्हापूरला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भौगोलिक दृष्ट्या संपन्न असण्याबरोबरच येथील नागरिकांचे विचारही संपन्न आहेत. कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत ६० हून अधिक कार्यक्रम घेण्यात आले. शाहू महाराजांनी आपल्या अल्प काळातदेखील क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. शाहू राजांच्या विचारांनी प्रेरित होऊन हेरवाड गावाने 'विधवा प्रथा बंदी'चा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा अनुयायी म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया, अशी भावनिक साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात घातली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला. क्लिक करा आणि वाचा- कृतज्ञता पर्व अंतर्गत '१०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना' या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मान्यवरांच्या हस्ते 'राष्ट्रीय रेकॉर्ड प्रमाणपत्र' प्रदान करण्यात आले.