'मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ...पण'; आमदार सुहास कांदेंनी बोलून दाखवली इच्छा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 7, 2022

'मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ...पण'; आमदार सुहास कांदेंनी बोलून दाखवली इच्छा

https://ift.tt/Gvo03WJ
: 'आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा (Uddhav Thackeray) फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे', असे वक्तव्य शिंदे गटाचे नांदगावचे बंडखोर यांनी केले आहे. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ( has said that if calls Eknath Shinde on Matoshri, we will all go together) सत्ता स्थापनेनंतर मतदार संघात येताच नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी सायंकाळी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. गुवाहाटी, गुजरात गोव्याला होतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना साईबाबांना केली होती. क्लिक करा आणि वाचा- बाबांनी माझ्या झोळीत ती भेट टाकली आणि मला न्याय दिला त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आल्याचे कांदे म्हणाले. हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा असे साकडं साई बाबांना घातले. मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो, न देवो, पण ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन, असे कांदे यांनी स्पष्ट केले. क्लिक करा आणि वाचा- मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावल तर सर्व सोबत मातोश्रीवर जावू. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे अशी ईच्छा सुहास कांदे यांनी बोलून दाखवली. आमची खदखद हि संजय राऊतांवर नव्हती तर विकास कामावरच होती. मात्र ज्या चाळीस आमदारांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले त्यांनाच राऊतांनी रेडा, डुक्कर असे म्हटले. संजय राऊत मोठे आणि ज्येष्ठ आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, अशा शब्दात आमदार सुहास कांदे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रसारमाध्यमांशी संवाद सुरू असतानाच कांदेंना आला विखे पाटलांचा फोन शिर्डीत साई दर्शनानंतर आ. सुहास कांदे प्रसार माध्यमांना बाईट देत असतानाच भाजपचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा त्यांना फोन आला. तुम्ही शिर्डीत आला मात्र मला फोन केला नाही असे विखे पाटलांनी विचारले असता, साहेब तुम्ही मिनिस्टर झाल्यावर करू म्हंटल फोन असे कांदे यांनी म्हंटल्याने विखे पाटलांच्या मंत्री मंडळातील समावेशाचे संकेत कांदे यांनी दिले आहेत.