
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील तालुक्यातील पडवण येथील रेल्वे ब्रिजखाली नदीच्या किनाऱ्यावर एका ३० वर्षीय आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कवटी फुटून गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत मिळाल्याने ही आत्महत्या की घातपात असा संशय निर्माण झाला आहे. त्या दिशेने लांजा पोलीस तपास करत आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नसून हा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा याचे गूढ कायम आहे. (the was found under the railway bridge) या तरुणाच्या डाव्या हाताची बोटे तुटलेली आहेत. तसेच त्याच्या छातीवर तरुणीचे नाव आहे. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार प्रेमप्रकरणातून घडला आहे की काय, असा असा संशय व्यक्त केला जात आहे. किंवा हा खून तर नसावा ना, असाही संशय हा मृतदेह पाहून निर्माण झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे वय ३० वर्षे इतके आहे. तसेच या तरुणाची कवटी फुटलेल्या अवस्थेत होती. या तरुणाची उंची सुमारे ५ फुट इंच इतकी आहे. तसेच त्याच्या छातीवर इंग्रजीमध्ये रवीना व जानू अशी नावे गोंदवलेली आढळलेली आहेत. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात स्टीलचे कडे देखील आहे. तर, त्याच्या डाव्या हाताची करंगळी व बाजूची बोटे तुटलेल्या स्थितीत आढळून आली आहेत. क्लिक करा आणि वाचा- ज्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळला आहे, त्यावरून प्रेमप्रकरणातून आत्महत्या किंवा घातपाताची शक्यता असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. आता पोलीस त्याच दिशेने लांजा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-