जीवावरचं शिक्षण! शाळेचे पत्रे तुटलेले, काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळला, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 8, 2022

जीवावरचं शिक्षण! शाळेचे पत्रे तुटलेले, काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळला, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

https://ift.tt/5aqnMXG
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या दोन शाळांची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या शाळेचे पत्रे तुटलेले आहेत. तर काही दिवसांपूर्वी या शाळेत स्लॅब देखील कोसळला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या समस्येची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. (In Ulhasnagar, the , ) उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती १ अंतर्गत बिर्ला गेट परिसरातील तानाजी नगरमध्ये उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक २३ आणि २६ या दोन शाळा आहेत. या शाळांकडे महापालिकेचं लक्षच नसल्यानं शाळांची अवस्था बिकट झाली आहे. शाळेच्या आवारात महापालिकेचं भंगार साहित्य पडलं आहे. वर्गांमध्ये पत्रे फुटलेले असल्याने सिलिंग कोसळलेल्या अवस्थेतच आहेत. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. काही दिवसांपूर्वी स्लॅबही कोसळला या शाळेत विद्यार्थ्यांना बसायला देखील जागा नाही. काही दिवसांपूर्वी स्लॅब पडला. शाळेनेही ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे. पण या समस्येकडे महानगरपालिकेने कानाडोळा केल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी केला आहे. इथे पाण्याची जागा आहे, पण तिथे पाण्याची टाकीच नाही. इथे प्रसाधनगृह आहे, मात्र तिथेही पाणी नाही. तुम्ही आत गेलात तरी तुम्हाला पाण्याची समस्या जाणवेल. कोणाला प्यायला देखील पाणी नाही. या शाळेची स्थिती खालावत चालली आहे. या समस्यांकडे महानगर पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर महापालिकेने या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले नाही, तर आम्ही आंदोलन करण्यासाठी आहोतच, असे कल्पेश माने यांनी म्हटले आहे. शाळेतील या समस्या महापालिकेने लवकरात लवकर सोडवल्या नाहीत, तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी दिलाय. त्यामुळे महापालिका या शाळांकडे लक्ष देते का?, हे आता पाहावे लागणार आहे.