शिवप्रेमींची चिंता वाढली; तळकोकणातला ऐतिहासिक ठेवा विजयदुर्गची तटबंदी ढासळतेय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 18, 2022

शिवप्रेमींची चिंता वाढली; तळकोकणातला ऐतिहासिक ठेवा विजयदुर्गची तटबंदी ढासळतेय

https://ift.tt/uKSchAQ
प्रसाद रानडे, कोकणाचा, तसेच महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा ऐतिहासिक वारसा असलेला सिंधुदुर्गातील या किल्ल्याची तटबंदी ढासळत असल्याने या किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. या किल्ल्याची पूर्वेकडची तटबंदी ढासळलेली असताना आता पश्चिमेकडील तटबंदी ढासळल्याने थेट समुद्राच्या उधाणाचे पाणी या किल्ल्यात शिरण्याची भिती व्यक्त होत आहे. इतिहासात या ऐतिहासिक किल्ल्याला शोर्यगाथा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या विजयदुर्ग किल्ल्याच्या ढासळत्या तटबंदीच्या अवस्थेकडे शासनाने तातडीने लक्ष दयावे, अशी मागणी येथील नागरिक,पर्यटक व इतिहास प्रेमींनी केली आहे. (The fortifications of the historic in Sindhudurga are crumbling) सुमारे १२७ वर्षे विजापूरकरांकडे असलेला किल्ले विजयदुर्ग १६५३ मध्ये छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर पुढे सुमारे १६५ वर्षे हा किल्ला मराठ्यांचा अंमलाखाली होता. या काळात किल्ल्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. किल्ल्यावर सरखेल कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमारप्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकियांनीही 'जिब्राल्टर' म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला. हा किल्ला शौर्याच्या आठवणी जागवत उभा असून पर्यटकही या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. असा हा ऐतिहासिक ठेवा तळकोकणाला लाभला आहे. पण शासनाच्या पुरातत्त्व विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मागील सुमारे दहा वर्षांपासून त्याची पश्चिमेकडील तटबंदी कमकुवत होऊन ढासळत आहे. याकडे पुरातत्त्व विभाग आणि शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर इतिहासाच्या आठवणींचा हा खजिना नष्ट होण्यास वेळ लागणार नाही अशी भिती व्यक्त होत आहे. कोकणातील विजयदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक ठेवा ढासळतोय ही खंत आहे. पण याकडे येथील लोकप्रतिनिधी व शासन, पुरातत्व खाते यांनी तात्काळ लक्ष घालून हा ठेवा जपायला हवा. येथील ऐतिहासिक पर्यटनालाही यामुळे महत्व आहे. यासाठी चालू अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत सकारात्मक तातडीने निर्णय घ्यावा, असे मत देवगड येथील कौटुंबिक समुपदेशक इतिहासप्रेमी ऍडव्होकेट सुमेधा साठे यांनी 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन' जवळ बोलताना व्यक्त केले. वाचा- जाणकारांच्या मते जवळपास ४०-४५ वर्षांपूर्वी किल्ल्याची तटबंदी ढासळली होती. त्यावेळी पुरातत्त्व खात्याने या तटबंदीची काही प्रमाणात डागडुजी केली होती; पण यासाठी विशिष्ट साहित्य वापरून हे काम झाले नाही. त्यामुळे त्यात फार यश आले नाही. केवळ सिमेंट व वाळूचे बांधकाम न करता त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विशिष्ट पध्दतीचे खास बांधकाम साहित्य वापरून ही दुरुस्ती करणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने तसा प्रयत्न झाला नाही. तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही भेट देत त्याची पाहणी केली होती. पण यालाही सुमारे दीड वर्ष उलटून गेली तरीही अद्याप त्याच्या डागडुजीला सुरुवात झालेली नाही. वाचा- किल्याचा ‘अ’ वर्गात समावेश अत्यावश्यक हा ऐतिहासिक ठेवा असलेला किल्ल्याच्या समावेश 'अ' वर्गात समावेश करणे आवश्यक आहे. इंग्रज, पोर्तुगीज, डच, आदी परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा होऊनही वास्तूचा एकही दगड ज्याचा एक दगडही सरकरला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजे विजयदुर्ग. इ.स. १२०५ मध्ये शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेला मिर्झावल्ली बेग यांच्या देखरेखेखाली या किल्ल्याचे बांधकाम केले. १६५३ मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला मराठा आरमाराची शौर्य गाथा आहे. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आता जपण्यासाठी केवळ आश्वासने न देता तातडीने केंद्र व राज्य सरकारने पावले उचलणे अत्यावश्यक आहे तरच हा किल्ला सुस्थितीत येईल अन्यथा हा किल्ला धोकादायक अवस्थेत जाईल अशी भीती व्यक्त होतेय. क्लिक करा आणि वाचा-