
सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री यांना सहकारातील कितपत माहिती आहे? हे माहित नाही. कारण, सहकार मंत्रिपद हे नेहमी सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींनाच दिले जाते. सहकार मंत्री अतुल सावे यांनी सहकाराबाबत सविस्तर माहिती घ्यावी. मुळात खात्याची माहिती नसणारेच कधी-कधी चांगले काम करतात, असा अभुनवही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार यांनी सांगितला.तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं होतं,असेही राजू शेट्टी म्हणाले. तर सहकार मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ऊस परिषदेत ठराव करू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार शेट्टी हे सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. गाळप हंगामात एकरकमी एफआपी मिळावी, यासह विविध प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी येत्या १५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार आहे. गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नवे सहकारमंत्री अतुल सावे हे लवकरच बैठक घेणार आहेत. याबाबत पत्रकारांनी शेट्टी यांचे लक्ष वेधले व प्रश्न विचारले.यावर राजू शेट्टीने उत्तर देताना प्रतिक्रिया दिली की,शेतकऱ्यांचे प्रश्न याच बैठकीत सुटले, त्यांवर टीका करण्याची वेळ येणार नाही. शेट्टी यांनी सांगितले त्याच ठिकाणी आम्ही सहकार मंत्री अतुल सावे यांच्या अभिनंदनाचा ठराव करू, असे सांगितले. साखर कारखान्याची काटेमारी रोखावी राजू शेट्टी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, राज्यातील साखर कारखानदारांकडून सर्रास काटामारी होते. एका वाहनामागे सुमारे दोन ते अडीच टनांची काटामारी होत आहे. किमान ३ हजार १०० रुपयांचा ऊसदर गृहित धरल्यास या काटामारीतून साखर कारखानदार वर्षाकाठी सुमारे ४ हजार ५८१ कोटी रुपयांचा दरोडा टाकत आहेत. यात शेतकऱ्यांची लूट तर होतेच, पण विनापावती साखरेची विक्री करुन सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयाच्या जीएसटीलाही चुना लावले जात आहे. तेव्हा सरकारने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे, हे तपासावे, असंर राजू शेट्टी म्हणाले.