
चितगाव: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चितगाव येथे सुरू झाली आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या लढतीत टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. , पहिला दिवस Live अपडेट ( Day 1 Live)>> असा आहे भारतीय संघ-शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज >> टॉसपहिल्या कसोटीत भारतीय संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने कुलदीप यादव, आर अश्विन आणि अक्षर पटेल या तिघा फिरकीपटूंना संधी दिली आहे. तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज हे जलद गोलंदाज संघात आहेत. >> आजपर्यंतच्या लढतीएकूण कसोटी-११भारताचा विजय- ०९बांगलादेश विजय- ००ड्रॉ- ०२