
औरंगाबाद : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील शिवारात असलेल्या विहिरीत दोघींचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात करण्यात आला की त्यांनी आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिखलठाणा गावात घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. स्वाती चव्हाण (वय १८ वर्षे) आणि शीतल चव्हाण (वय १५ वर्षे) अशी मृत बहिणींची नावे आहेत.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तू चव्हाण हे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांना स्वाती आणि शीतल अश्या दोन मुली आहेत. १४ जानेवारी रोजी दोघी घराबाहेर गेल्या होत्या. मात्र रात्र झाली तरी देखील त्या घरात परतल्या नसल्याने वडिलांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत. वडील दत्तू चव्हाण यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान १६ जानेवारी रोजी काही शेतकरी शिवारातील विहिरी जवळून जात असताना त्यांना विहिरीत मुलीचा तरंगता मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तो पाण्याबाहेर काढला असता तो मृतदेह स्वातीचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र शीतलचा अजूनही शोध लागलेला नव्हता.हेही वाचा : चार ते पाच तास शोध घेतल्यावर तिचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. गाळाला शीतलचा मृतदेह अडकला होता. दोन्ही बहिणींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. शवविच्छेदन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा अपघात, घातपात की आत्महत्या हे स्पष्ट झाले नाही, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करित आहेत.हेही वाचा :